For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

TMC Ex MP Join BJP ममता दिदींच्या तीन माजी सहकाऱ्यांनी थेट भाजमध्ये प्रवेश केला, बंगालच्या राजकारणात टीएमसीची गळती सुरुच

08:06 PM Jul 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
tmc ex mp join bjp ममता दिदींच्या तीन माजी सहकाऱ्यांनी थेट भाजमध्ये प्रवेश केला  बंगालच्या राजकारणात टीएमसीची गळती सुरुच
Advertisement

प्रदेश भाजप अध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांना पक्षात सामील करून घेण्यात आले.पक्षाच्या सॉल्ट लेक येथील कार्यालयात राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, भट्टाचार्य यांनी माजी खासदारांना भाजपचे झेंडे देऊन त्यांचे स्वागत केले.

Advertisement

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर गेल्या महिन्यात देव, राय आणि बराइक यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता आणि तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडले होते . राय आणि बराइक यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२९ पर्यंत, तर देव यांचा कार्यकाळ एप्रिल २०३० पर्यंत चालणार होता.

तिन्ही जागांसाठी पोटनिवडणूक २४ जुलै रोजी होणार असून, भाजप तिन्ही जागा जिंकेल अशी अपेक्षा आहे. भट्टाचार्य म्हणाले की, तीन माजी खासदारांच्या अनुभवामुळे राज्यात पक्षाला आणखी बळकटी मिळेल.

Advertisement

विधानसभेतील पक्षीय बलाबल

२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर, २९४ सदस्यांच्या सभागृहात भाजपने २०८ जागा मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले, तर तृणमूल काँग्रेसने ८० जागा जिंकल्या. काँग्रेस आणि आम जनता उन्नयन पार्टी (एजेयूपी) यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या, तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.

निवडणूकीनंतर अभूतपूर्व फूट

विधानसभा निवडणूकीनंतर बंगालमध्ये सुरु झालेल्या पक्षांतराची लाट आणि तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेली फूट बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक ठरली. निवडणूकीनंतर सुरु झालेल्या राजीनाम्यांमुळे भाजपचे संख्याबळ २०७ आणि एजेपीचे १ झाले, त्यामुळे सत्ताधारी पक्षाला भक्कम बहुमत मिळाले आणि विरोधी गटाकडे ८५ आमदार उरले.

सर्वसाधारण परिस्थितीत, विरोधी पक्षांचे एकत्रित संख्याबळ एक राज्यसभा जागा मिळवण्यासाठी पुरेसे ठरले असते, तर भाजपला उर्वरित दोन जागा मिळाल्या असत्या. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षनेते ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटांमध्ये टीएमसी फुटल्यानंतर राजकीय समीकरण नाट्यमयरित्या बदलले .

Advertisement
Tags :

.