महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अरुणाचल प्रदेशमध्ये तीन जवान हुतात्मा

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लष्कराचा ट्रक दरीत कोसळल्याने दुर्घटना, अन्य 4 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/इटानगर

Advertisement

अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये लष्कराचे 3 जवान हुतात्मा झाले असून 4 जण जखमी झाले आहेत. हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष अशी या जवानांची नावे आहेत. या अपघातात तिन्ही जवानांचा जागीच मृत्यू झाल्याचे इटानगर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या पूर्व कमांडने जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. सी. तिवारी  यांनीही शोक व्यक्त करताना भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवर ‘अप्पर सुबनसिरी जिह्यातील तापीजवळ झालेल्या एका भीषण अपघातात लष्कराच्या तीन जवानांच्या मृत्यूमुळे मला खूप दु:ख झाले आहे. देशासाठी त्यांची सेवा आणि सर्वोच्च बलिदान व्यर्थ जाणार नाही. मी भगवान बुद्धांना शूर आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतो.’ असे ट्विट केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article