For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहिंग्यांना आश्रय देणाऱ्यांना बांगलादेशात पाठवणार

04:01 PM Jan 14, 2025 IST | Pooja Marathe
रोहिंग्यांना आश्रय देणाऱ्यांना बांगलादेशात पाठवणार
Advertisement

रत्नागिरी

Advertisement

बांग्लादेशी रोहिंगे भारत अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांग्लादेशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच तर बांग्लादेशी नागरिकांसहीत आश्रय देणाऱ्यांना सुद्धा बांग्लादेशात पाठवून देऊ असा इशारा बंदरें, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सोमवारी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे बंदरे, मत्स्य व्यवसाय, पत्तन, कस्टम, पोलीस, महसूल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. आढावा बैठकीनंतर नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सागरी सुरक्षा, एलईडी मासेमारी, पर्ससीननेट मासेमारी, किनारपट्टीवर अनधिकृत बांधकाम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले आहे. काही बंदरांतून देशविरोधी कारवाया केल्या जातआहेत. त्यावर आपल्या विभागाचे लक्ष आहे. त्या कारवाया तात्काळ थांबल्या पाहिजेत. याबाबतची माहिती आपण पोलिसांना दिली आहे. पोलीस त्याबाबतची. कारवाई करतील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. रत्नागिरीतील प्रमुख बंदरांसह मिरकरवाडा बंदरावर राज्य, केंद्र सरकारच्या माध्यमातून खर्च झालेल्या निधीचा अहवाल राणे यांनी अधिकाऱ्यांकडून मागविला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.