गोव्यात तिसऱ्या जिह्याच्या निर्मितीची प्रक्रिया मार्गी
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त
पणजी : राज्यात तिसऱ्या जिह्याच्या निर्मितीची प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली असून त्यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली खास समिती स्थापन केली आहे. या समितीत अन्य सदस्यांमध्ये वित्त खात्याचे प्रधान सचिव, निवासी आयुक्त महसूल सचिव, उत्तर आणि दक्षिण जिह्यांचे जिल्हाधिकारी, यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चाऊदत्त पाणिगृही यांचा समावेश आहे. राज्याला तिसऱ्या जिह्याची खरोखरच गरज आहे व त्यामुळे सर्वसाधारण आणि खास करून मागासलेल्या तालुक्यांचा विकास व कल्याण होईल की नाही यासंबंधी सदर समिती मूल्यमापन करेल. त्याशिवाय तिसऱ्या जिह्याच्या सीमा सुचवतानाच लोकसंख्या, आर्थिक स्थिती, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि जनमत, आदी विविध बाबींचाही सदर समिती विचार करेल. तसेच नवीन जिह्याच्या निर्मितीमुळे येणारा खर्च आणि होणारे फायदे यांचेही मूल्यांकन करण्यात येणार आहे. सदर समिती साधारणत: पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करण्याची शक्यता आहे.