For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप-काँग्रेस दोन्ही पक्षांचे राजकारण द्वेषावर आधारित

05:49 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
भाजप काँग्रेस दोन्ही पक्षांचे राजकारण द्वेषावर आधारित
Advertisement

तेलंगणात बरसले ओवैसी : संघाला उद्देशूनही केली टिप्पणी

Advertisement

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे सातत्याने भाजप आणि काँग्रेसविरोधात आक्रमक आहेत. भाजप आणि काँग्रेस दोघांचेही राजकारण द्वेषावर आधारित आहे. काँग्रेस नेत्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे. तेलंगणात काँग्रेस नेत्यांना अन्य कुणी नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नियंत्रित करतो. परंतु तेलंगणात आम्ही संघाला शिरकाव करू देणार नाही. तसेच संघाच्या चाहत्यांनाही थारा मिळू देणार नसल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे. भाजप आणि काँग्रेसचे राजकारण द्वेषावर आधारित आहे. मजलिसचे बळ आता लोकांना कळले आहे. याचमुळे लोक मजलिसचे नाव घेत असल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे. यापूर्वी ओवैसी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रे•ाr यांच्यावर संघाचे समर्थक असल्याचा आरोप केला होता. रेवंत रे•ाr यांचे आणखी एक नाव आरएसएस अण्णा आहे. रेवंत रे•ाr हे संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. हैदराबादमधील काँग्रेस मुख्यालय सध्या संघाकडून नियंत्रित केले जात असल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे. ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमने तेलंगणातील केवळ 9 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.