For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एफएमसीजी’च्या कामगिरीने बाजारात तेजी कायम

06:09 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एफएमसीजी’च्या कामगिरीने बाजारात तेजी कायम
Advertisement

सेन्सेक्स 102.44 तर निफ्टी 71.35 अंकांनी वधारले : टायटनचे समभाग मजबूत

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारातील चालू आठवड्यामधील तिसऱ्या सत्रात बुधवारी पुन्हा तेजीची नोंद झाली आहे. दिवसभरातील कामगिरीत मात्र काही मोठ्या घटना न झाल्याने व मोठी उलाढाल फारशी दिसली नाही. परंतु सुस्तीच्या स्थितीला तेजीच्या स्वरुपात बदलण्यास एफएमसीजी क्षेत्रांची मोठी मदत झाल्याचे बुधवारच्या सत्रात दिसून आले. दिवसभरात एफएमसीजीमधील समभागांच्या नेतृत्वामुळे संथ असणाऱ्या गतीला वेग मिळाल्याने लहान कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्समधील निर्देशांक 0.87 टक्क्यांनी मजबूत राहिला. मिडकॅप 0.43 टक्क्यांनी वधारला आहे.

Advertisement

बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 102.44 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 0.13 टक्क्यांसोबत 80,905.30 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 71.35 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 24,770.20 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील 30 समभागांमधील 17 समभाग हे वधारले आहेत. यात टायटन, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया आणि आयटीसी यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्टस, टीसीएस, अॅक्सिस बँक, लॉर्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, कोटक बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँक यांचे समभाग नफा कमाईत राहिले.

दुसरीकडे अन्य कंपन्यांमध्ये 30 पैकी 13 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, टाटा स्टील, पॉवरग्रीड कॉर्प आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीत राहिले होते. यासह एचसीएल टेक, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोर्ट्स, इन्फोसिस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि सनफार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

देशातील मुख्य घडामोडींमुळे बाजाराला सकारात्मक बळ मिळाले असले तरी बाजारात बुधवारी एफएमसीजी, ग्राहक, कमोडिटी व औषध या क्षेत्रांनी मजबूत कामगिरी केल्याचा अधिकचा लाभ हा भारतीय बाजाराला झाला आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयांच्या संकेतामुळे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यासावध भूमिकेत भारतीय बाजार टीकून राहिला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.