एलएनजी पुरवठ्यावरील बंदी सरकारने उठवली
06:04 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
देशात द्रवीकृत नैसर्गिक वायूचा (एलएनजी) पुरवठा आता पूर्ववत झाल्यानंतर आता केंद्र सरकारने अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धांदरम्यान लागू केलेला आपत्कालीन नैसर्गिक वायू पुरवठा नियमन आदेश मागे घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी केली. एलएनजीचा वापर उद्योगात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे या निर्णयामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. पश्चिम आशियामध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलएनजी जहाजांची सामान्य वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement