कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Surrogacy Law : कोण आई-बाप होईल हे सरकार ठरवू शकत नाही!

07:05 AM Oct 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरोगसी कायद्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : केंद्र सरकारचा युक्तिवाद फेटाळला

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सरोगसीशी संबंधित प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर एखाद्या महिलेने 2022 पूर्वी गोठवलेले गर्भ (फर्टिलाइज्ड एग्ज) ठेवले असतील तर तिला सरोगसी कायद्याअंतर्गत वयोमर्यादेतून सूट मिळू शकते, असे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि के. व्ही. विश्वनाथन यांनी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. याप्रसंगी खंडपीठाने वाढत्या वयाला चिंतेचे कारण म्हणून उद्धृत केल्याबद्दल सरकारला फटकारले. नैसर्गिक प्रक्रियेतही वयाची मर्यादा नसल्यामुळे कोण आई-बाप होऊ शकते हे सरकार ठरवू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जारी केलेले हे संपूर्ण प्रकरण जानेवारी 2022 मध्ये लागू झालेल्या सरोगसी कायदा 2021 शी संबंधित आहे. कायद्यानुसार, फक्त 26 ते 55 वयोगटातील पुरुष आणि 23 ते 50 वयोगटातील महिलांना सरोगसी करण्याची परवानगी आहे. मात्र, आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सरोगसी (नियमन) कायदा, 2021 लागू होण्यापूर्वी सरोगसी प्रक्रिया सुरू करणाऱ्या जोडप्यांना कायद्यात नमूद केलेली वयोमर्यादा ओलांडली तरीही ते प्रक्रिया सुरू ठेवू शकतात. कायदा लागू होण्यापूर्वी काही जोडप्यांनी त्यांचे गर्भ गोठवल्यानंतर सरोगसीचा अधिकार अधिक दृढ झाला होता. त्यावेळी वयोमर्यादा अस्तित्वात नसल्यामुळे कायद्यात प्रदान केलेली वयोमर्यादा या प्रकरणांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, असे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. याप्रसंगी वयस्कर जोडपे मूल वाढवण्यास योग्य नसतील हा केंद्र सरकारचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला.

सरोगरी कायद्याविरुद्ध न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मुख्य याचिकाकर्ता चेन्नई येथील वंध्यत्व तज्ञ डॉ. अरुण मुथुवेल असून त्यांनी व्यावसायिक सरोगसीवरील बंदी उठवण्याची मागणी केली होती. अनेक महिन्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जुलै 2025 मध्ये आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. जेव्हा गेमेट्स (शुक्राणू आणि अंडी) काढले जातात आणि गर्भ गोठवले जातात तेव्हा सरोगसी प्रक्रियेची सुरुवात विचारात घेतली जाईल. या टप्प्यानंतर जोडप्याला पुढे काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण पुढचे पाऊल सरोगेट आईच्या गर्भाशयात गर्भ रोपण करणे आहे. अशाप्रकारे, न्यायालयाने असे मानले की या टप्प्यापर्यंत जोडप्याने सरोगसी करण्याचा त्यांचा हेतू दृढ केला होता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतात आयुर्मान सतत वाढत असून नैसर्गिक गर्भधारणा किंवा दत्तक घेण्यासाठी वयोमर्यादा नाही हे न्यायमूर्ती नागरत्न यांनी निदर्शनास आणून दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणी...

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article