For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बद्रीनाथ’चे द्वार 4 मे रोजी उघडणार

06:33 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘बद्रीनाथ’चे द्वार 4 मे रोजी उघडणार
Advertisement

चारधाम यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी : वसंत पंचमीच्या दिवशी टिहरीच्या राजपुत्राकडून तारीख जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ देहराडून

उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडले जातील. टिहरीच्या राजदरबारात रविवारी वसंत पंचमीच्या दिवशी दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली. याप्रसंगी यात्रेकरू, पुजारी, दिमरी समुदाय आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement

दरवर्षी बद्रीनाथ धामचे द्वार उघडण्याची तारीख वसंत पंचमीच्या दिवशी जाहीर केली जाते. त्यानुसार यंदा 4 मे रोजी सकाळी 6 वाजता विशेष वैदिक जप आणि धार्मिक विधींनी दरवाजे उघडले जातील असे जाहीर करण्यात आले आहे. गेल्यावर्षी 17 नोव्हेंबर रोजी रात्री 9:07 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे हिवाळी हंगामासाठी बंद करण्यात आले होते. वास्तविक, परंपरेनुसार, हिंदू कॅलेंडर आणि खगोलीय पिंडांच्या स्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर दरवाजे बंद केले जातात. गेल्या वर्षी 11 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी बद्रीनाथला भेट दिली होती. तर 13.5 लाखांहून अधिक भाविक केदारनाथला पोहोचले होते.

उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख नरेंद्रनगर पॅलेसमध्ये निश्चित करण्यात आली आहे. परंपरेनुसार, रविवारी, राजपुत्राने टिहरी जिह्यातील नरेंद्रनगर येथील राजवाड्यात महाराजा मानवेंद्र शाह आणि राजकुमारी श्रीजा शाह यांच्या उपस्थितीत पूजा केली. तसेच, श्री बद्रीनाथजी धामचे दरवाजे 4 मे रोजी सकाळी 6 वाजता उघडतील अशी घोषणा करण्यात आली. तसेच, 22 एप्रिल रोजी नरेंद्रनगर येथील राजमहाल येथे भगवान बद्रीविशाळ यांच्या अभिषेकासाठी तिळाचे तेल काढले जाईल, असेही सांगण्यात आले.

रविवारी झालेल्या बैठकीमध्ये श्री बीकेटीसी अध्यक्ष अजयेंद्र अजय, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय प्रसाद थापलियाल यांच्यासह धर्माधिकारी वेदपाठी रवींद्र आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी नरेंद्र नगरच्या राजदरबारात तारीख निश्चित करण्याच्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. व्यवस्थापक नवीन भंडारी, कुबेर देवरा समितीचे अध्यक्ष जशवीर मेहता, सचिव अनूप भंडारी यांच्यासह महिला मंगल दल पांडुकेश्वर, नारायण नंबूदरी, राजेश नंबूदरी, मंजेश भुजवान, दर्शन कोतवाल, वजीर अधिवक्त आशिष रतुरी आदीही उपस्थित होते, अशी माहिती महाराजा मनुज्येंद्र शाह यांनी दिली.

22 एप्रिलपासून यात्राप्रवास

22 एप्रिल रोजी राजदरबारात तिळाचे तेल काढल्यानंतर डिम्मर पंचायतीचे लोक गडू घडा यात्रेसाठी त्यांच्या गंतव्यस्थानाकडे रवाना होतील. या काळात ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, डिम्मर गाव आणि पांडुकेश्वर यासारख्या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर ही यात्रा 3 मे रोजी बद्रीनाथ धामला पोहोचेल. 4 मे रोजी भगवान बद्री यांच्यावर तिळाच्या तेलाने महाभिषेक केल्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील.

Advertisement
Tags :

.