लादेनशी संबंधित दहशतवादी अड्डाउद्ध्वस्त
ओसामा बिन लादेनने दिले होते 10 दशलक्ष डॉलर्स
ओसामा बिन लादेनने 10 दशलक्ष डॉलर्स रुपये देत ज्या दहशतवादी अड्डयाची निर्मिती करविली होती, जेथे मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार अजमल कसाब समवेत अन्य दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्याला दहशतवाद्यांचा कारखाना संबोधिले जाते अशी सर्व ठिकाणे भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या स्ट्राइकमध्ये नेस्तनाबूत झाली आहेत.
मुरीदके येथील दहशतवादी अड्डयाला लष्कर-ए-तोयबाचे मुख्य केंद्र मानले जाते. हे शेखपूरा पंजाब पाकिस्तानात आहे. दहशतवादाचे हे केंद्र निर्माण करण्यासाठी लादेनने 10 दशलक्ष डॉलर्स दिले होते. मुरीदकेमध्ये दरवर्षी सुमारे 1 हजार युवकांना दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जायचे.
चिनी हवाई सुरक्षा यंत्रणा एचक्यू-9 निष्प्रभ
ब्राह्मोसनंतर स्कॅल्पकडून ड्रॅगनच्या यंत्रणेचा पोलखोल
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कठोर प्रतिक्रिया देत पाकिस्तान विरोधात एअर स्ट्राइक पेले आहेत. भारताने पाकिस्तान आणि पीओकेत दहशतवाद्यांच्या अ•dयांवर क्षेपणास्त्रs डागली आहेत. भारताच्या एअरस्ट्राइकने चिनी हवाई सुरक्षा यंत्रणेचा पोलखोल केला आहे. ब्राह्मोसनंतर स्कॅल्प क्षेपणास्त्र देखील डिटेक्ट करण्यास चिनी हवाई सुरक्षा यंत्रणा अपयशी टरली आहे. ज्या हवाई सुरक्षा यंत्रणेचा पाकिस्तान तोरा दाखवत होता, त्यानेच त्याची फसवणूक केली आहे.
चिनी एअर डिफेन्ससाठी भारतीय ब्राह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांना ट्रॅक करणे अशक्य ठरले आहे. त्यामुळे पीओक दहशतवादी अड्डयावर क्षेपणास्त्र कोसळल्यावरही आता पाकिस्तानला पुढील पाऊल उचलणे अवघड आहे, कारण चिनी हवाई सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याने त्याचा विश्वास डळमळीत झाला असणार आहे. भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता, वेग आणि हल्ल्याच्या तीव्रतेने चीनच्या रक्षा कवचाला तडे गेल्याचे सिद्ध केले आहे.
भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानात तैनात हवाई सुरक्षा यंत्रणांची पोलखोल केली आहे. पाकिस्तानने अलिकडच्या वर्षांमध्ये चीन आणि तुर्कियेच्या मदतीने स्वत:च्या हवाई सुरक्षा यंत्रणेला मजबूत केल्याचा दावा केला होता, परंतु भारतीय क्षेपणास्त्रांसमोर ही यंत्रणा निष्प्रभ ठरली आहे. पाकिस्तानने चीनकडून एचक्यू-9 आणि एलवाय-80 आणि एलवाय-80/एचक्यू-16 डिफेन्स सिस्टीम खरेदी केली होती. याचबरोबर पाकिस्तानने जॅमर आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीम तैनात केली होती, या सर्व यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.