कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चहा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग

12:51 PM May 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :

Advertisement

भारतामध्ये चहा हे केवळ एक गरम पेय नसून एक अशी भावना आहे, जी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. सकाळच्या सुरुवातीपासून ते रात्रीच्या निवांत वेळेपर्यंत, चहाचा कप हा भारतीयांच्या हातात अनेक प्रसंगांमध्ये दिसतो. “चहा स्पेशल“, “चहाची लज्जत यारी“, “चहा नाश्ता“ यांसारख्या जाहिराती चहाच्या लोकप्रियतेचे व त्याच्या सामाजिक महत्त्वाचे दर्शन घडवतात.

Advertisement

चहाचा भारतीय प्रवास 19व्या शतकात ब्रिटिशांच्या आगमनानंतर सुरू झाला. पूर्वी फक्त चीनमध्ये प्रचलित असलेल्या या पेयाचे भारतातील प्रसाराचे श्रेय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जाते. त्यांनी आसाम व दार्जिलिंगमध्ये चहाची लागवड सुरू केली आणि पाहता पाहता भारत चहा उत्पादनात अग्रेसर ठरला. आज भारत हा जगातील दुस्रया क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. आसाम, दार्जिलिंग, निलगिरी, कांग्रा, आणि मुनार हे भारतातील प्रमुख चहा उत्पादक भाग असून, येथून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर चहा वितरित होतो.

भारतीय घरांमध्ये चहाचा वापर हा केवळ चवापुरता मर्यादित नाही, तर तो एक पारंपरिक सवय बनलेली आहे. प्रत्येक राज्यात, प्रत्येक भागात चहा बनवण्याची वेगळी पद्धत आहे. काहीजण ब्लॅक टी (साधा काळा चहा) पितात, तर काहीजण मसाला चहा पसंत करतात, ज्यामध्ये आले, वेलची, दालचिनी, लवंग यांसारखे मसाले वापरले जातात. ग्रीन टी, लेमन टी, टुलसी टी आणि हर्बल टी यांसारखे पर्यायही आरोग्यप्रेमींमध्ये लोकप्रिय झाले आहेत. चहापत्ती आणि चहा मसाल्याचे ब्रँड्ससुद्धा आज विविध प्रकारांत बाजारात उपलब्ध आहेत. जाहिरातींमध्ये “चहा पावडर विविध ब्रँड्स“ किंवा “चहाची खास लज्जत मसाल्यांसोबत“ यांसारखे संदेश दिसतात, जे चहाच्या वैविध्यपूर्ण चवांची माहिती देतात.

चहा आणि भारतीय सामाजिक जीवन यांचे एक घट्ट नाते आहे. भारतात “चहा पिणे“ ही एक क्रिया न राहता, ती एक सवय आणि परंपरा बनली आहे. सकाळी उठून वर्तमानपत्रासोबत चहा, दुपारच्या गप्पांमध्ये टपरीवरचा चहा, ऑफिसमध्ये ब्रेक दरम्यानचा चहा किंवा पावसाळ्यात गरमागरम भजीसह घेतलेला चहा हे सारे अनुभव चहाशिवाय अपूर्ण वाटतात. “चहा पे चर्चा“, “चहाची लज्जत यारी“ अशा जाहिरातीतून चहा सामाजिक मैत्री, संवाद आणि आपुलकीचे प्रतीक बनतो.

भारतात पाहुणचाराचे देखील एक अविभाज्य अंग म्हणजे चहा. कुणी घरी आलं की लगेच विचारलं जातं “चहा घेणार का?“ सण-उत्सव, लग्न, नामकरण अशा कार्यक्रमांमध्येही चहा एक महत्त्वाचा घटक असतो. विशेषत: थंडीच्या दिवसांत गरम चहा आणि त्यासोबत खमंग नाश्ता म्हणजेच पकोडे, भजी, बिस्किटे यांचे आकर्षण वेगळेच असते. “चहा नाश्ता“ ही कल्पना याच परंपरेचा एक भाग आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात, चहा केवळ एक पेय न राहता, तो विश्रांतीचा, संवादाचा आणि जोडणीचा माध्यम बनला आहे. तो स्नेह वाढवतो, संवाद घडवतो आणि क्षणांना खास बनवतो. त्यामुळे चहा हा भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा खरा हिरो आहे. तर मग, आजचा दिवस संपवताना गरमागरम चहाचा कप हातात घेऊन, त्या प्रत्येक घोटात भारताच्या संस्कृतीची चव अनुभवायला हरकत नाही!

 चहा उद्योगामुळे लाखो लोकांना थेट किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळतो. चहाच्या बागांमध्ये काम करण्राया शेतमजुरांपासून, चहा विकण्राया टपरीधारकांपर्यंत, चहाची प्रक्रिया करण्राया उद्योगांपासून, पॅकेजिंग व मार्केटिंग करण्राया कंपन्यांपर्यंत हा व्यवसाय विस्तारलेला आहे. “गद्रे टी कंपनी“, “प्रमाची चहा“, “मॅजिक टी अँड कॉफी फ्रँचायझी“ यांसारखे ब्रँड्स याच व्यवसायिक मूल्याची साक्ष देतात. चहा उद्योग देशाच्या निर्यातीतही मोठा वाटा उचलतो.

 चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतात. मसाला चहामध्ये असलेले आले, वेलची, लवंग पचनासाठी उपयुक्त असतात. काळा चहा थकवा दूर करून ऊर्जा प्रदान करतो, तर ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. “चहाची लज्जत“ आणि “अच्छे दिन“ यांसारख्या जाहिरात वाक्यांतून चहाचे मानसिक व शारीरिक फायदे अधोरेखित होतात. मात्र, तज्ञांच्या मते, चहाचे अतीसेवन टाळणे आवश्यक आहे, कारण त्यातील कॅफिनचे दुष्परिणाम देखील संभवतात.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article