सर्वोच्च न्यायालयाचा कन्नूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना झटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केरळच्या कन्नूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने गोपीनाथ रविंद्रन यांच्या सेवानिवृत्तीनंतर देखील कन्नूर विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून पुन्हा नियुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द ठरविला आहे. तसेच न्यायालयाने याप्रकरणी रविंद्रन यांच्यावर अनुचित पद्धतीने हस्तक्षेप करण्याप्रकरणी टीका केली आहे.
याप्रकरणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी केली आहे. गोपीनाथ रविंद्रन यांना कुलगुरु पदावर पुन्हा नियुक्त करण्याच्या राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचा आदेश चुकीचा असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. रविंद्रन यांची पुनर्नियुक्ती कायम ठेवण्याच्या केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय खंडपीठाने रद्द केला आहे. कुठल्याही राज्यात विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल असतात.
रविंद्रन यांना कुलगुरु पदावर पुन्हा नियुक्ती करण्याची अधिसूचना कुलपतींकडून जारी करण्यात आली होती. तरीही पुनर्नियुक्तीचा निर्णय राज्य सरकारच्या अनुचित हस्तक्षेपाने प्रभावित होता असे खंडपीठाने म्हटले आहे. या खंडपीटात न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांचाही समावेश होता.