महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सुनील मित्तल यांना ब्रिटनचा मानद नाईटहूड पुरस्कार प्रदान

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल हे ‘नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ (केबीइ) ने सन्मानित होणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. ब्रिटनमधील हा सर्वात मोठा सन्मान आहे, ज्याद्वारे परदेशी नागरिकांना मानद पदवी दिली जाते. भारत आणि ब्रिटनमधील व्यावसायिक संबंध सुधारण्यात मदत केल्याबद्दल राजा चार्ल्स तिसरा याने त्यांना मानद नाइटहूड बहाल केला आहे. भारती एअरटेलने लिंक्डइनवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुनील मित्तल म्हणाले ‘मी ब्रिटिश सरकारचा आभारी आहे. किंग्ज चार्ल्स यांच्याकडून हा सन्मान मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. यूके आणि भारत यांचे ऐतिहासिक संबंध आहेत जे आता वाढीव सहकार्याच्या नवीन युगात प्रवेश करत आहेत. आपल्या दोन महान देशांमधील आर्थिक आणि द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मी ब्रिटिश सरकारचा ऋणी आहे.’ असेही मित्तल यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

टागोरांनी नाइटहूडचा सन्मान परत केला

भारतीय साहित्यातील एकमेव नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना 1915 मध्ये ब्रिटीश सरकारने नाइटहूडने सन्मानित केले होते, परंतु दोन वर्षांनंतर टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा तीव्र निषेध करून आपली पदवी परत केली. सुनील भारती मित्तल हे टेलिकॉम टायकून म्हणून ओळखले जातात, ज्यांची कंपनी देशातील सर्वात मोठ्या मोबाईल फोन ऑपरेटरपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरटेलचे 474 दशलक्ष ग्राहक आहेत. सुनील भारती मित्तल यांना 1988 मध्ये राज्यसभेसाठी नामांकन मिळाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article