For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष

01:37 PM May 08, 2025 IST | Radhika Patil
दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी  पालकांचे  लक्ष
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावी परीक्ष 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान झाली. या परीक्षेला कोल्हापूर विभागातून 357 केंद्रावर 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावी परीक्षेच्या निकालानंतर आता दहावीच्या परीक्षेच्फा निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे. 12 ते 15 मे दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाकडून दहावीची पेपर तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच कला व क्रीडासाठी आलेल्या अर्जांची छाणनी करून गुणदान केलेले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्व विषयाचे गुण पुणे राज्य शिक्षण मंडळाकडे जमा केले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विभागीय मंडळाकडून दहावीच्या पेपर तपासणी व ऑनलाईन गुण भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होतो. त्यामुळे 12 ते 15 जून दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाकडून सांगितले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.