महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धडाकेबाज...सरफराज खान

Advertisement

भारतानं इंग्लंडला पुरतं लोळविलेल्या तिसऱ्या कसोटीत वाहवा झाली ती यशस्वी जैस्वालच्या दुसऱ्या द्विशतकाची...त्याचबरोबर महत्त्वपूर्ण छाप उमटविली ती पदार्पणात दोन्ही डावांमध्ये वेगवान अर्धशतकं नोंदवून आपल्या कौशल्याची पुरेपूर झलक दाखविलेल्या सर्फराज खाननं...हा गुणवान खेळाडू बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाची दारं ठोठावत होता. त्याला सदोदित हुलकावणी देणारी संधी अखेर यावेळी मिळाली अन् दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा फळाला आली...
Advertisement

प्रसंग एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेलशा दृष्याचा...राजकोट येथील भारत नि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस...त्या 26 वर्षीय खेळाडूकडे पहिली कसोटी कॅप सोपविली ती दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळेनं. त्यानंतर त्यानं सीमारेषेकडे धाव घेतली. तिथं ही घटना अनुभवत होते त्याचे आनंदित वडील नि पत्नी. त्यानं वडिलांना मिठी मारली आणि प्रतिष्ठेची कॅप त्यांना दिली. यावेळी तिघांचेही डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाहीत...तशी प्रतिक्रिया स्वाभाविक...कारण मुळात भारतीय संघात, त्यातही कसोटी चमूत वर्णी लागणं हे खूपच अभिमानाचं. पण ही संधी चालून येण्यासाठी जितकी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली त्यामुळं मुंबईच्या त्या खेळाडूसाठी हा क्षण अधिकच खास बनला...

पण खरी परीक्षा त्यानंतर होती...मालिका 1-1 अशी बरोबरीत आलेली अन् इंग्लंडनं त्यांच्या अनोख्या खेळाच्या शैलीतून आव्हान उभं केलेलं असल्यामुळं भारताला ‘फायर पॉवर’ची गरज भासणारी...सर्फराज खाननं नेमकं केलं ते तेच...तो क्रीझवर आला तेव्हा परिस्थिती काय होती ? मार्क वूडनं यशस्वी जैस्वाल व शुभमन गिलला, तर टॉम हार्टलेने रजत पाटीदारला लवकर पॅव्हेलियनची वाट दाखविल्यानं भारताची अवस्था 8.5 षटकांत 3 बाद 33 अशी बिकट झालेली...रोहित शर्माला आधार देण्याच्या मधल्या फळीवरील दबावामुळं रवींद्र जडेजाला डाव स्थिर करण्यासाठी क्रमवारीत बढती देण्यात आली होती. या जोडीनं 204 धावांची मोठी भागीदारी करून ती जबाबदारी यशस्वीरीत्या पेललीही...

पण सर्फराजनं दाखविलेला धडाका वेगळा ठरला, त्यातही उठून दिसला...त्याची सुऊवात तितक्या सहजपणे झाली नाही. कारण इंग्लंडनं अपेक्षेप्रमाणं प्रतिस्पर्ध्यांविषयीचा गृहपाठ व्यवस्थित केला होता आणि आखूड टप्प्याच्या चेंडूंविऊद्धचा त्याचा खेळ हा चर्चेचा विषय राहिलेला. त्यामुळं वूडनं आल्या आल्या त्याच्यावर मारा केला तो तशाच प्रकारच्या चेंडूंचा. सर्फराज खाननं मग पवित्रा घेतला तो शक्य तितके उसळते चेंडू चुकविण्याचा...पण जसजशी फिरकी येऊ लागली तसतसा त्याचा खरा खेळ बाहेर येऊ लागला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स क्षेत्ररक्षणाच्या रचना सतत बदलत राहिला, पण प्रत्येक वेळी असा बदल झाल्यानंतर खाननं त्यावर मात करण्यासाठी आरामात चेंडू उचलून फटकावण्याचा मार्ग स्वीकारला...

स्वत: शतकाच्या दिशेनं वाटचाल करणारा रवींद्र जडेजा त्यावेळी कोशात गेला होता अन् भागीदारीत आक्रमक भूमिका घेतली होती ती सर्फराजनं. या दोघांनी पाचव्या यष्टीसाठी 77 धावा जोडल्या. त्यापैकी तब्बल 62 धावा आल्या त्या त्याच्या बॅटमधून. यावरून त्याचा धडाका लक्षात यावा...सर्फराज खाननं कसोटी क्रिकेटपटू म्हणून दोन्ही डावांमध्ये फटकावून एका पराक्रमाची नोंद केली. पण याची चुणूक त्यानं खूप पूर्वी दाखवून दिली होती...

सर्फराज हे नाव सर्वप्रथम दुमदुमलं ते मुंबईची प्रमुख शालेय स्पर्धा असलेल्या ‘हॅरिस शिल्ड’मध्ये 421 चेंडूंत 439 धावा फटकावून त्यानं सचिन तेंडुलकरचा एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा 1988 पासूनचा विक्रम मोडल्यानंतर. त्यावेळी तो फक्त 12 वर्षांचा...त्यानंतर त्यानं वडिलांचं स्वप्न साकारण्याच्या मार्गावरून वेगानं वाटचाल करताना आधी मुंबईच्या अन् 2014 मध्ये भारताच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळवलं...19 वर्षांखालील विश्वचषकात सर्फराज खाननं जमविलेल्या काही धावा त्याला 2015 साली ‘इंडियन प्रीमियर लीग’साठीचा ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’चा करार पदरात पाडून गेल्या (त्यावेळी तो ‘आयपीएल’मध्ये संधी मिळालेला सर्वांत तरुण खेळाडू ठरला) मात्र 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्यानं खरी छाप उमटविली ती 2016 मध्ये दुसऱ्यांदा खेळताना. त्यावेळी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्यानं दुसरं स्थान मिळविलं. जोडीला ‘आयपीएल’मधील फटकेबाजीही त्याच्याविषयी आश्वासक चित्र निर्माण करून गेली...

या पार्श्वभूमीवर भारतीय संघात प्रवेश सर्फराजसाठी फार दूर नाही असंच वाटत होतं. पण अचानक परिस्थिती बदलली...त्याच्या तंदुऊस्तीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातच समीक्षकांना, टीकाकारांना चुकीचं सिद्ध करण्याआधीच त्याला 2017 साली दुखापतीचा सामना करावा लागला. यामुळं त्यावर्षीच्या ‘आयपीएल’च्या संपूर्ण हंगामाला मुकण्यासह बराच काळ मैदानापासून दूर राहावं लागलं...

या घडामोडींनी सर्फराज खानला प्रकाशझोतापासून दूर नेलं. हे कमी म्हणून की काय त्यानं देशांतर्गत क्रिकेटमधील आपला संघही बदलण्याचं पाऊल उचलताना मुंबईहून उत्तर प्रदेशच्या तंबूत प्रवेश केला. त्यानंतर रणजीत चांगली फलंदाजी करणं चालू राहिलं, तरी ‘आयपीएल’मधी कामगिरी पुरेशी प्रभावशाली राहिली नाही. या पार्श्वभूमीवर लहान वयातच भारताकडून खेळण्याची अपेक्षा असलेला एक विलक्षण फलंदाज अचानक कधी अनेक खेळाडूंच्या गर्दीचा भाग बनला ते कळलंच नाही...

सर्फराज आणि त्याचे वडील नौशाद खान मात्र हार मानायला तयार नव्हते...तो त्याच्या तंदुरुस्तीवर आणि फलंदाजीवर काम करत राहिला. 2019-20 च्या मोसमात तो मुंबईला परतला आणि हाच त्याच्यासाठी ‘टर्निंग पॉइंट’ बनला...देशांतर्गत क्रिकेटमध्ये शतकांमागून शतकं झळकावत त्यानं धावांचा रतीब ओतण्यास सुऊवात केली...प्रत्येक हंगामात तो भारतीय संघाची दारं जोरजोरात ठोठावत होता. वरिष्ठ संघ निवड समितीची बैठक झाली की, ‘सोशल मीडिया’वर ज्यांच्याविषयी चर्चा रंगायची त्यात त्याचं नाव हटकून असायचं. पण ती दारं उघडण्यास तयार नव्हती...

सर्फराज खान हताश व्हायचा, मात्र धावांची भूक कायम होती. तीच त्याला शेवटी राष्ट्रीय संघात पोहोचवून गेलेली असली, तरी हे काही सुखासुखी घडलेलं नाही...त्याला बोलावणं येण्यात एकंदर परिस्थितीनं ज्या प्रकारे वळण घेतलंय त्याचाही मोलाचा वाटा. अनेक खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळं शेवटी भारतीय व्यवस्थापनाला सर्फराजचा विचार करण्यास भाग पडलं असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही...अन् त्यानंही मिळालेल्या संधीचं सोनं करत दोन्ही डावांत दाखवून दिलीय ती तीच धावांची भूक. !

रणजीतील भन्नाट पराक्रम...

अन्य प्रताप...

खेळ जुनाच ओळख नवी : सायकलिंग- मॅडिसन

मॅडिसन...एक सांघिक ‘ट्रॅक सायकलिंग‘ प्रकार आणि काही प्रमाणात ‘पॉइंट्स रेस’सारखाच...125 वर्षांहून अधिक जुना इतिहास लाभलेल्या ‘मॅडिसन’चं नाव जिथून त्याचा उगम झाला त्या म्हणजे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’वरून पडलंय...

- राजू प्रभू

बुद्धिबळाच्या पटावरचा नवोदित तारा : यश गोगटे

बुध्दिबळ.. बुध्दीला आयाम देणारा खेळ. या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅग्नस कार्लसन असो अथवा भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वनाथन आनंद आणि गेल्या काही वर्षात युवा नेतृत्व बनलेला आर प्रग्यानंद असो.... या खेळात शह आणि मात देण्याच्या चाल करत करत भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या खेळांडूनी पुनश्च बुध्दिबळ खेळाकडे युवकांचे लक्ष आकषित झालेले आहे. असाच रत्नागिरीचा बुध्दिबळ विश्वातला नवोदित आणि लखलखता तारा म्हणजे यश गोगटे. हीच दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या यश गोगटे याने आपले कौशल्य पणाला लावत यश संपादित केलेले होते. तसं पाहायला गेलं तर बुध्दिबळ स्पर्धेत एकाग्रता आणि नियोजनबध्द चाल आवश्यक असते. आपली खेळी खेळण्याआधी समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचे डोळे वाचता आले पाहिजेत. हे कौशल्य यश गोगटेला सततच्या सरावामुळे चांगलेच जमते.

काही दिवसांपूर्वी केजीएन सरस्वती फाऊंडेशनतर्फे  सप्रे स्मृती अतिजलद बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे यांच्या नावाने रत्नागिरीत सलग दहाव्या वर्षी खुल्या जलद व अतिजलद बुद्धीबळ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेला तांत्रिक सहकार्य चेसमेन रत्नागिरी संस्थेने केले होते. रत्नागिरीसाठी अभिमानास्पद व अत्यंत महत्त्वाची बाब हीच की या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील फिडे मानांकित, बिगर मानांकित असे एकूण 111 खेळाडू सहभागी झालेले असूनही मोठ्या शिताफीने यशने आपले संपूर्ण लक्ष एकवटून या स्पर्धेचा विजयी ठरला. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ]िवशेष म्हणजे यापैकी 40 हून अधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय फीडे गुणांकन प्राप्त खेळाडू होते. जलद व अतिजलद स्पर्धेत मिळून आयोजकांकडून एकूण एक लाखांची बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे यांच्यासोबत दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले यांनी काम पाहिले होते.

स्पर्धेत यशसमोर कडवे आव्हान होते इतकेच नाही बुध्दिबळ जगतातील अग्रमानांकित असलेले मंदार लाड, ओंकार कडव, रवींद्र निकम यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंवर मात करत यश गोगटेने या स्पर्धेचे विजेतेपद काबिज केल होते. या स्पर्धेत मंदार लाड याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. याआधी देखील अनेकदा यश गोगटेने यशाची पंरपरा कायम राखतव रत्नागिरीला गौरवान्वित केलेले आहे. याआधी 2019 मध्ये झालेल्या एसव्हीजेसीटी स्पोर्टस अॅकडमी डेरवण येथे झालेल्या अंडर 19 युथ चेस टुर्नामेंट मध्ये यश संपादित केलेले होते. 21 वर्षाखालील क्लासिकल बुध्दिबळ स्पर्धेत देखील तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये देखील यशने आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. यश गोगटे सततच्या सरावामुळे समोरचा  प्रतिस्पर्धी कोणती चाल खेळून मात देऊ शकतो हे काही क्षणातच तो ओळखतो. त्यातच विविध स्पर्धा खेळून पाहून यश गोगटे निश्चितच येत्या काही दिवसात रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीdया स्तरावर पोहचवून रत्नागिरीला आणि कोकणाला नवीन ओळख देऊ शकतो यात शंकाच नाही...

शब्दांकन : स्वऊप काणे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article