सातुळीतील शांताराम कानसे यांची गळफास घेत आत्महत्या
01:27 PM Feb 20, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
वार्ताहर/आंबोली
सावंतवाडी तालुक्यातील सातुळी - मधलीवाडी येथील शांताराम कृष्णा कानसे ( ६१ ) यांनी घरापासून साधारण एक कि.मी. अंतरावर आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लाऊन घेत आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार दिपक शिंदे ,अभिजित कांबळे घटनास्थळी रवाना झाले असून पंचनामा सुरु केला असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही .कानसे यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, अविवाहीत मुलगा, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article