For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शंभू छत्रपती आणि जिजाबाई राणीसाहेब

12:24 PM May 09, 2025 IST | Radhika Patil
शंभू छत्रपती आणि जिजाबाई राणीसाहेब
Advertisement

कोल्हापूर / सौरभ मुजुमदार :

करवीर संस्थानचे पहिले छत्रपती व शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज करवीरकर उर्फ शंभू छत्रपती होय.या छत्रपतींचा कार्यकाल प्रदीर्घ म्हणजेच इ.. 1714 ते 1760 असा जवळजवळ 46 वर्षांचा होता. मुघल काळात करवीर निवासिनी अंबाबाईची मूळ मूर्ती मंदिरा बाहेर संरक्षणासाठी ठेवलेली होती. परंतु या संभाजीराजे छत्रपती यांच्या आज्ञेनुसार देवीची हिच मूर्ती मोठ्या थाटामाटात गर्भगृहात पुन?प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीची पूजा अर्चा, वर्षभरातील विविध उत्सव याच्या व्यवस्थेच्या अनेक सनदादेखील याच काळात देण्यात आल्या. संभाजीराजे हे धार्मिक वृत्तीचे होते हे त्यांनी मंदिरांना आणि साधुसंतांना दिलेल्या विविध सनदा पत्रांवरून समजते. करवीरची विस्कळीत झालेली घडी याच छत्रपतींच्या काळात सुरळीत झाली. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यामध्ये दाजीपूर अभयारण्यात कोकणच्या घाटमाथ्यावर असणारा अभेद्य व भक्कम किल्ला म्हणजेच ठशिवगडठ होय. याच शंभू छत्रपती यांच्या आज्ञेवरून पंत अमात्य भगवंतराव यांनी हा किल्ला बांधला.

Advertisement

20 डिसेंबर 1960 रोजी दुपारी दोन वाजता शंभु छत्रपतींची स्वारी कसबे वडगाव येथे होती. तेथे प्रकृती बिघडल्याने ते करवीरकडे येत असताना वाटेतच टोप नजीकच्या माळावर त्यांची प्राणज्योत मालवली. या गावाला संभापूर असे नाव देण्यात आले.

नंतर त्यांच्या पत्नी जिजाबाई राणीसाहेब यांनी पंचगंगेच्या दक्षिण किन्रायावर संभाजीराजे यांची मेघडंबरी (देवालय)बांधल्याचा उल्लेख सापडतो. संस्थान शिवसागरच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम समोर याच समाधी मंदिराचे दर्शन होते. शंभू छत्रपतींच्या या देवालयाचे बांधकाम इ.. 1767 ला संपले. त्यास त्यावेळी तीस हजार रुपये इतका खर्च आला. तर याच्या पूजा अर्चा वैगेरे व्यवस्थेचे आज्ञापत्र राणोजी घोरपडे सेनापती यांना इ.. 1768 ला देण्यात आले. आकर्षक पितळ धातूच्या प्रभावळी पुढे पाषाणातील शिवलिंग रूपातील हे मंदिर आजही लाखो करवीर वासीयांचे श्रद्धास्थानच आहे. मंदिरात प्रवेश करताच उजवीकडे गंध उगाळण्याचे मोठे सहाण व ते गंध साठविण्यासाठी पाषाण स्वरूपातील छोटे कुंड पहावयास मिळते.

Advertisement

  • जिजाबाई राणीसाहेब 

याच मंदिरात शिवलिंगाच्या शेजारीच पाषाण स्वरूपातील स्त्राr देवते समान असणारी बैठी मूर्ती हि श्री संभाजी महाराज करवीरकर यांच्या पत्नी जिजाबाई राणीसाहेब यांचीच आहे . संभाजी महाराजांसोबत वेळ प्रसंगी प्रत्यक्ष लढाईसाठी मैदानात उतरण्राया या करवीर संस्थानच्या जिजाबाई छत्रपतींनीही अनेक निर्णायक आज्ञापत्रे दिली.अनेक प्रसिद्ध इतिहासकार व अभ्यासकांनी जिजाबाई राणीसाहेबांबद्दल आपली मते व्यक्त केली त्यावरूनच त्या धाडसी, अत्यंत चाणाक्ष बुद्धीच्या ,व सर्वांना सोबत घेऊन जाण्राया होत्या हे समजते. वासुदेवशास्त्राr खरे म्हणतात की ठकरवीर संस्थानचे राज्य स्थापनेत यांचा वाटाही मौल्यवान आहे. त्यांची हिंमत, मसलतीचे धोरण, मनाची दृढता, व कुलाभिमान हे गुण वर्णनीय होतेठ छत्रपती संभाजीराजेंच्या नंतर छत्रपती घराणे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जिजाबाई राणीसाहेबांनी सुमारे बारा वर्षे जिद्दीने पार पाडलेली होती.

..1762 मध्ये नृसिंहवाडी तीर्थक्षेत्रास जाताना याच जिजाबाईंनी कोल्हापूरचा संपूर्ण राज्यकारभार पाच कुणबी स्त्रियांकडे सोपविल्याची नोंद सापडते. ज्यां स्त्राrयांनी तो यशस्वीपणे पारही पाडलेला होता. वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) वरही राणी जिजाबाई यांनी इ.. 1740 ला यमाई देवी मंदिरासमोर मोठे तळे बांधलेले होते. 17 फेब्रुवारी 1773 रोजी त्या पन्हाळा गडावर कैलासवासी झाल्या आणि ताराराणी साहेबांचा वारसा चालवण्राया करवीर राज्यातील एका जबरदस्त महत्त्वाकांक्षी, जिद्दी, चाणाक्ष ,धाडसी महाराणींचा कालखंड समाप्त झाला.

संस्थान शिवसागर मधील छत्रपती संभाजी महाराज उर्फ शंभू छत्रपती तसेच त्यांच्या पत्नी जिजाबाई राणीसाहेब यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणार्या, ज्यांनी मोठ्या कौशल्याने करवीर संस्थान व आपल्या प्रजेचा जिवापाड सांभाळ केला त्यांच्या या मंदिरासमोर आजही लाखो कोल्हापूरकरांचे हात आपोआपच जुळले जातात.

करवीर महात्म्य, गुरुचरित्र अशा विविध ग्रंथामध्ये उल्लेख असण्राया, पंचगंगा नदी काठावरील सर्वात प्राचीन श्री तारकेश्वर देवावर छत्रपती संभाजी महाराजांची नितांत श्रद्धा होती. त्यांचे हे समाधी मंदिर देखील या श्री तारकेश्वर देवाच्या सान्निध्यातच आहे.

Advertisement
Tags :

.