For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri Accident News: महामार्गावर ऑईल सांडल्याने ३ दुचाकींना अपघात

05:41 PM May 09, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri accident news  महामार्गावर ऑईल सांडल्याने ३ दुचाकींना अपघात
Advertisement

शासकीय दिरंगाईमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; संगमेश्वर-रत्नागिरी मार्गावरील घटना

Advertisement

संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी सकाळी उक्षी फाटा परिसरात एक विचित्र अपघात घडला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडल्याने वेगात असलेल्या तीन दुचाकी एकापाठोपाठ एक घसरल्या. या अपघातात चार जण किरकोळ जखमी झाले असून नशिबाने मोठी जीवितहानी टळली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व दुचाकीस्वार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. उक्षी फाट्याजवळ रस्त्यावर ऑईल सांडलेले असल्याने चालकांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, तिन्ही दुचाकी रस्त्यावर लांबवर फरफटत गेल्या.

Advertisement

स्थानिकांकडून तातडीने मदत
अपघात होताच परिसरात खळबळ उडाली. महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी माणुसकी दाखवत तत्काळ आपली वाहने थांबवली आणि जखमींना मदत केली. ऑईल कोणत्या वाहनातून सांडले हे अद्याप समजू शकलेले नाही.

नागरिकांचा तीव्र संताप
भररस्त्यात ऑईल सांडलेले असताना प्रशासनाने किंवा महामार्ग विभागाने ते तातडीने स्वच्छ का केले नाही? असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.