रेल्वे देखील अलर्ट मोडमध्ये
प्रवाशांसोबत ट्रेन-यार्ड-स्थानकाच्या सुरक्षेसाठी योजना
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचदरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेवरून भारतीय रेल्वे देखील हायअलर्ट झाली आहे. रेल्वेने रेल्वेगाड्या, स्थानकांसोबत यार्डांची सुरक्षा वाढविली आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील रेल्वेयार्डामध्ये एआय तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले आहेत. याची सुरुवात उत्तर-पश्चिम रेल्वेपासून केली जात आहे. याचदरम्यान देशभरातील रेल्वेस्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावर आरपीएफने विशेष तपासणी अभियान हाती घेतली आहे. राजधानी दिल्ली समवेत महानगरांच्या दिशेकडून येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांच्या डब्यात जात पथक तपासणी करणार आहे.
रेल्वे बोर्डाने याला नोडल झोन देखील केले आहे, येथूनच देशभरातील रेल्वेयार्डच्या सुरक्षेवर देखरेख ठेवली जाईल. याचबरोबर त्यांचा डिजिटल लेखाजोखा ठेवला जाणार आहे. सीसीटीव्हीद्वारे रेल्वे, स्थानक परिसरासोबत आता यार्डवर देखील नजर ठेवली जाईल. देशभरात रेल्वे यार्डच्या संवेदनशील क्षेत्रे म्हणजेच पॉइंट, क्रॉसिंग आणि सिग्नल सिस्टीमवर एआय तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील.
रेल्वेयार्डमध्ये सिग्नलिंगपासून दूरसंचार आणि पॉइंट मशीन्स यासारखी महत्त्वपूर्ण उपकरणे लावलेली असतात, त्यांची सुरक्षा थेट ट्रेन संचालनाशी निगडित असते. अशास्थितीत या ठिकाणी 24 तास देखरेख मोठा बदल ठरू शकतो. एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने तेथे कुठलाही तांत्रिक बिघाड किंवा छेडछाडचा त्वरित थांगपत्ता लागू शकणार आहे.