बाबा बैद्यनाथ धामला राहुल गांधी यांची भेट
गळ्यात हार अन् गुलाबी धोतर परिधान
वृत्तसंस्था /रांची
झारखंडमधील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देवघरमधील प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ धामला भेट देऊन पूजा केली. 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरू झालेली ही यात्रा शुक्रवारी दुपारी झारखंडमध्ये दाखल झाली. पाकूरमधील लिट्टीपारा येथे रात्री थांबल्यानंतर काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी सकाळी गो•ा जिह्यातील सरकंदा चौकातून पुन्हा सुरू झाली. यानंतर राहुल गांधी दुपारी अडीच वाजता भगवान शिवाला समर्पित असलेल्या प्राचीन मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी तेथे पूजा केली. राहुल गांधी देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाम मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांच्या समर्थकांनी राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. झारखंडमधील भारत जोडो न्याय यात्रा दोन टप्प्यात होणार असून या कालावधीत 13 जिह्यांमध्ये 804 किलोमीटरचे अंतर 8 दिवसात कापले जाणार आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ 67 दिवसांत 6,713 किलोमीटरचे अंतर कापून 15 राज्यांतील 110 जिह्यातून 20 मार्चला मुंबईत संपेल.