राजकारण माझ्यासाठी भावनात्मक मुद्दा !
केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये भाजप तिरुअनंतपुरम जिल्हा समितीने केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचे स्वागत केले. यावेळी सुरेश गोपी यांनी लोकांना संबोधित करताना मी पूर्वी एसएफआयमध्ये होतो, परंतु राजकीय दृष्टीकोन बदलण्यामागचे कारण केवळ भावनात्मक असल्याचे म्हटले आहे.
माझ्या वडिलांचे कुटुंब काँग्रेसशी संबंधित होते. तर माझ्या आईच्या कुटुंबाने केरळमध्ये जनसंघासाठी काम केले. मी एसएफआयमध्ये होतो. परंतु त्यानंतर वेगळा राजकीय विचार स्वीकारण्यामागे भावनात्मक कारण होते. मी स्वत:चे जीवन भावनात्मक स्वरुपात जगणार आहे. माझा वंश, माझ्या परंपरा, सनातन धर्माचे सौंदर्य आहे. मला या सर्व मूल्यवान गुणांना प्रदर्शित करायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधी या केवळ काँग्रेसच्या नेत्या होत्या आणि म्हणून मी त्यांच्या क्रूर कृत्यासाठी त्यांना जबाबदार ठरविणे टाळू शकत नाहीत असेही त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी सुरेश गोपी यांनी इंदिरा गांधी यांना मदर ऑफ इंडिया असे संबोधिले होते. याप्रकरणी त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. मी दिवंगत नेत्याला देशात काँग्रेस पक्षाच्या माता असे संबोधिले होते. माझ्या टिप्पणीला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सुरेश गोपी हे पर्यटन आणि पेट्रोलियम-गॅस राज्यमंत्री आहेत. त्रिशूरचे खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश गोपी यांनी काँग्रेस उमेदवार के. मुरलीधरन यांना पराभूत पेले होते.