Why PM Modi said don't buy gold? : पुढचं वर्षभर सोनं का विकत घेऊ नका? काय आहे यामागचं कारण?
सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण! पण विचार करा, जर स्वतः देशाचे पंतप्रधानच तुम्हाला सांगत असतील की पुढचं वर्षभर सोनं विकत घेऊ नका, तर त्यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. तुमची एक छोटीशी सोन्याची खरेदी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी अडचणीत आणू शकते? चला, सोप्या भाषेत आपल्या छोट्या गोष्टीतून समजून घेऊया.
पण त्या आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जगण्यासाठी पेट्रोल-डिझेल लागतं, जेवणासाठी तेल लागतं. या गोष्टी आपण टाळू शकत नाही. पण सोनं ही आपली 'गरज' नसून ती एक 'गुंतवणूक' किंवा 'हौस' आहे. जेव्हा आपण सोनं घेतो, तेव्हा आपण देशाला जास्त गरजेच्या असलेल्या गोष्टींच्या बजेटवर नकळत परिणाम करत असतो.या सगळ्यात डॉलरचा खेळ चालतो कसा का?
आपण जेव्हा सोनं विकत घेतो, तेव्हा भारत सरकारला ते दुसऱ्या देशाकडून विकत घ्यावं लागतं. हे सोनं विकत घेण्यासाठी सरकारला डॉलर्स मोजावे लागतात. जेवढं जास्त सोनं आपण घेऊ, तेवढे जास्त डॉलर्स आपल्या देशाबाहेर जातील. आपल्या देशातून जेव्हा मोठ्या प्रमाणावर डॉलर्स बाहेर जातात, तेव्हा जागतिक बाजारात भारतीय रुपयाची किंमत कमी व्हायला लागते. रुपया कमकुवत झाला की आपल्या देशात इतर सगळ्या गोष्टी म्हणजे मोबाईल, गाड्या, पेट्रोल महाग होतात. म्हणजेच, आपल्या सोन्याच्या हौसेमुळे इतर वस्तूंचे भाव वाढू शकतात.
सोन्याचे भाव का वाढतायत?
सध्या जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत किंवा अस्थिरता आहे. जेव्हा जगाला भीती वाटते, तेव्हा मोठे गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून पैसा काढून सोन्यात टाकतात, कारण सोनं ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि भाव गगनाला भिडले आहेत.