महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयटी’मध्ये महिलांचा टक्का वाढणे आवश्यक : ईशा अंबानी

07:00 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

देशातील माहिती तंत्रज्ञान कार्यक्षेत्रामध्ये महिलांची संख्या वाढवण्याची अपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी यांनी येथे ‘गर्ल्स डे इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’ निमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना  व्यक्त केली आहे. यामध्ये महिलांना समान वागणूक देण्यावर भर देताना त्या म्हणाल्या की, त्यांना शिक्षक किंवा ‘सॉफ्ट स्किल’ आधारित नोकऱ्यांसाठी सर्वात योग्य समजण्यासाठी जुने सामाजिक रूढीवादी विचार जबाबदार आहेत. नॅसकॉमच्या मते, भारतातील तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांपैकी केवळ 36 टक्के महिला आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित पदवीधरांमध्ये महिलांचे प्रमाण हे 43 टक्के आहे, परंतु शास्त्रज्ञ, अभियंता आणि तंत्रज्ञांमध्ये महिलांचा सहभाग केवळ 14 टक्के असल्याचेही यावेळी नमूद केले आहे. ‘लिंगभेद हे केवळ लिंगभेदाचे प्रतीक नाही तर ते एक अडथळा देखील आहे. नवनिर्मितीचा मार्ग आहे. जर आपण आपल्या लोकसंख्याशास्त्राrय परिस्थितीचा फायदा घ्यायचा असेल तर स्त्राr आणि पुरुष दोघांनाही पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

 विकासात महिला कमीच

तंत्रज्ञान उद्योगाच्या सतत विकसित होत असलेल्या वाढीमध्ये कामगारांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. ही घट दूर करणे सध्याच्या घडीला आवश्यक आहे. समाजाच्या तसेच उद्योगाच्या वाढीत तसेच विशेषत: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांची संख्या वाढण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article