महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू

11:09 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी संघटनांचा हेस्कॉमला इशारा, विविध मागण्यांसाठी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर छेडले आंदोलन

Advertisement

बेळगाव : कृषी पंपसेटला आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया त्वरित रद्द करावी, त्याचबरोबर अक्रमसक्रम योजना पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरू सेनेच्यावतीने बुधवारी व्यापक आंदोलन करण्यात आले. नेहरुनगर येथील हेस्कॉमच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे धरत शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदविला. राज्याच्या विद्युत विभागाकडून मागील महिनाभरापासून कृषी पंपसेटला आधार नोंदणी केली जात आहे. आधार नोंदणी करून भविष्यात ग्राहकांना वीजबिल देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. त्याचबरोबर यापूर्वी अक्रमसक्रम योजना सुरू असल्याने शेतापर्यंत विद्युतखांब घालून शेतकऱ्यांना वीजपुरवठा दिला जात होता.

Advertisement

परंतु, सध्या अक्रमसक्रम बंद केल्याने शेतकऱ्यांनाच विद्युतखांब व विद्युतवाहिन्यांचा खर्च करावा लागत आहे. यामुळे एका कनेक्शनसाठी लाखभर रुपये खर्च करावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बुधवारी हेस्कॉमच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे धरत शेतकऱ्यांनी आवाज उठविला. राज्य सरकारकडून शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले जात आहे. अनेक शेतकऱ्यांची घरे शेतामध्ये असून त्यांना सिंगल फेज कायमस्वरुपी वीजपुरवठा देणे गरजेचे असताना केवळ थ्री फेज विद्युतपुरवठ्यावर काही तासच वीज दिली जात आहे. या सर्व मागण्यांचा विचार करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भीमशी गडादी, जिल्हाध्यक्ष शंकर मुद्देहळ्ळी, तालुकाध्यक्ष राजू मरवे यांच्यासह इतर उपस्थित होते.

अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच मांडल्या भोजनासाठी चुली...

अधीक्षक अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे यांनी निवेदन स्वीकारत आपण शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. परंतु, ठोस आश्वासन दिले जात नाही तोवर माघार घेणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडून आपल्या दुपारच्या भोजनाच्या चुलीही मांडल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article