For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोषक वातावरण, पेरणी कामाला गती

10:19 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोषक वातावरण  पेरणी कामाला गती
Advertisement

विजापूर जिह्यातील स्थिती : 1.23 लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट : कृषी संचालकांची माहिती

Advertisement

वार्ताहर /विजापूर 

यंदा वळीव व मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने पेरणीसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी जमीन मशागत व पेरणीच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसत आहे. 2024-25 च्या पावसाळी हंगामात कृषी विभागाच्या व्याप्तीतील मुद्देबिहाळ तालुक्यातील 56,711, तालिकोट तालुक्यातील 66,330 अशा एकूण 1,23,041 हेक्टर शेतजमिनीमध्ये पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक फेरपालट,बीजप्रक्रिया या बाबी लक्षात घेऊन पेरणी करावी, अशी माहिती साहाय्यक कृषी संचालक सुरेशा भाविकट्टी यांनी दिली आहे.अधिक माहिती देताना त्या पुढे म्हणाल्या, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तूर, मूग, मका, सूर्यफुल बियाणांचे वितरण करण्यात येत आहे. कोणताही शेतकरी पेरणीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

Advertisement

बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या शेतकरी संपर्क केंद्राला भेट देऊन तेथे आधारकार्ड,फार्म स्टब पावती आणि शेतकरी नोंदणी क्रमांक दाखल करावा. मान्सूनपूर्व पावसाने गतवर्षी समाधानकारक हजेरी लावली नव्हती. मात्र यंदा पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा समाधानी आहे. काहींनी पेरणीसाठी बी-बियाणे व खते खरेदी केली आहेत. तर काहींनी पेरणीची कामे केली आहेत. मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला आहे. 2024-25 च्या पावसाळी हंगामात मुद्देबिहाळ तालुक्यात 56,711, तालिकोटे तालुक्यात 66,330 आणि एकूण 1,23,041 हेक्टर शेती क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक फेरपालट आणि बीजप्रक्रिया या बाबी लक्षात घेऊन पेरणी करावी, असे आवाहन  मुद्देबिहाळचे  साहाय्यक कृषी संचालक सुरेश भाविकट्टी यांनी केले आहे.

दर्जेदार पीक घेण्याचे नियोजन हवे

भविष्यात पिकांवर विविध रोग पडण्याची स्थिती निर्माण झाल्यास ते टाळण्यासाठी रयत केंद्रातून ट्रायकोडर्मा औषधाचा वापर करावा. पिकांचे योग्य नियोजन असल्यास त्यातून फायदा हेऊ शकतो. माती परीक्षण करुन त्यानुसार आवश्यक असणाऱ्या घटकांच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन तांत्रिक कृषी अधिकारी राजेश्वरी नादगौडा यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.