For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ट्राय’कडून कोणताही कॉल केला जात नाही!

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ट्राय’कडून कोणताही कॉल केला जात नाही
Advertisement

नागरिकांनी सतर्क राहण्याचे दूरसंचार नियामकचे निर्देश 

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दूरसंचार नियामक ट्रायने मोबाईलधारकांना ट्रायच्या नावाने केल्या जाणाऱ्या बनावट कॉलला बळी पडू नका असा इशारा दिला आहे. या कॉल्समध्ये, टेलिकॉम ग्राहकांना मोबाइल नंबर डिस्कनेक्ट करण्याची धमकी देऊन काही वैयक्तिक माहिती देण्यास सांगितले जाते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने स्पष्ट केले की ते मेसेज पाठवून किंवा इतर कोणत्याही प्रकारे मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करण्याबाबत ग्राहकांशी संवाद साधत नाहीत. तसेच कोणत्याही तृतीय-पक्ष एजन्सीला तसे करण्यास अधिकृत केले नसल्याचेही व अशा प्रकारे, ट्रायकडून आणि मोबाईल नंबर डिस्कनेक्ट करण्याची धमकी देणारा कोणताही कॉल (संदेश किंवा सूचना) संभाव्य फसवणुकीचा प्रयत्न मानला जावा, तेव्हा त्याकडे लक्ष देऊ नका.

Advertisement

टेलिकॉम सेवा प्रदाता फक्त बिल भरण्यात अनियमितता, केवायसी पूर्ण न करणे किंवा नंबरचा गैरवापर झाल्यास मोबाईल नंबरची सेवा बंद करू शकतो. ट्रायने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि संशयित फसवणूक करणाऱ्यांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. ‘ग्राहकांनी अशा कॉल्सची खात्री करण्यासाठी संबंधित टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत कॉल सेंटर किंवा ग्राहक सेवा केंद्रांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो,’ ट्रायने म्हटले आहे. रेग्युलेटरच्या म्हणण्यानुसार, हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की नागरिकांना ट्रायकडून अनेक प्री-रेकॉर्ड केलेले कॉल केले जात आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांचे नंबर लवकरच ब्लॉक केले जातील अशी धमकी दिली जाते आणि त्यांची वैयक्तिक माहिती मागितली जाते. सायबर गुह्यांमध्ये दूरसंचार संसाधनांचा गैरवापर आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी, लोकांना दूरसंचार विभागाच्या कम्युनिकेशन पार्टनर फोरमवर व्हिज्युअल सुविधेद्वारे संशयित फसव्या संप्रेषणाची तक्रार करण्यास प्रोत्साहित केले जाते.

Advertisement
Tags :

.