For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rain Impact on Flight मुसळधार पावसामुळे मुंबईतील ४ उड्डाणे रद्द, १३ विमानांचे मार्ग बदलले

06:22 PM Jul 05, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
rain impact on flight मुसळधार पावसामुळे मुंबईतील ४ उड्डाणे रद्द  १३ विमानांचे मार्ग बदलले
Advertisement

गेल्या २४ तासांत राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम विमान मार्गांवर झाला आहे. रविवारी मुंबईत झालेल्या प्रचंड पावसामुळे चार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आणि १३ विमानांचे मार्ग बदलण्यात आले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. मार्ग बदलण्यात आलेली सर्व विमाने आता मुंबईत परतली आहेत.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुसळधार पाऊस, कमी झालेली दृश्यमानता आणि ४२ नॉट्सपर्यंतच्या वेगाचे सोसाट्याचे वारे यांसारख्या प्रतिकूल हवामानामुळे सकाळी १०.१७ च्या सुमारास धावपट्टीवरील कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

"कार्यपद्धतीनुसार, प्रवासी, विमाने आणि जमिनीवरील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी धावपट्टीवरील कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले होते," असे प्रवक्त्याने सांगितले. हवामानात सुधारणा झाल्यानंतर, सकाळी ११.१७ वाजता धावपट्टीवरील कामकाज पुन्हा सुरू झाले. ही स्थगिती सुमारे ६० मिनिटे लागू होती.

Advertisement

हेही वाचा : Ritu Tawde “मी रीलस्टार आहे की रियल स्टार ते मुंबईकर ठरवतील” महापौर रितू तावडे कुर्ला दुर्घटनेवरुन भडकल्या

मुंबईला रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचवेळी, आर्थिक राजधानी मुंबई मुसळधार पावसाच्या परिणामांशी झुंज देत आहे. आयएमडीने रविवारी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी लोकांना वरळीच्या समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आणि पोलीस व नागरी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे शहरभर झाडे पडली, रस्ते खचले, घरे कोसळली आणि वाहतूक कोंडी झाली. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि पाणी साचलेल्या व किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.