संविधान जागृती रथयात्रेचा निम्म्याहून अधिक टप्पा पूर्ण
10:22 AM Feb 12, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : संविधानाच्या मूल्यांविषयी जागृती करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून सुरू करण्यात आलेल्या दोन चित्ररथांनी जिल्ह्यातील 289 ग्राम पंचायती व 22 स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी दिल्या. 500 ग्राम पंचायती व 38 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी या दोन चित्ररथांनी शनिवार दि. 10 फेब्रुवारीपर्यंत निम्म्याहून अधिक भ्रमण पूर्ण केले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, समाज कल्याण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते चित्ररथांना चालना देण्यात आली. उर्वरित ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रातही संविधान जागृती जथ्था भेट देणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article