For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार कंपन्यांचे बाजारमूल्य 93 हजार कोटींनी वाढले

06:18 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार कंपन्यांचे बाजारमूल्य  93 हजार कोटींनी वाढले
Advertisement

मुंबई :

Advertisement

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान, देशातील मुख्य 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण 92,995.48 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

यामध्ये खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक आणि दूरसंचार कंपनी भारती एअरटेल या तेजीमध्ये आघाडीवर आहेत. दुसरीकडे, बाजारातील मंदीमुळे उर्वरित सहा कंपन्यांना तोटा सहन करावा लागला आणि त्यांच्या मूल्यांकनात एकत्रितपणे 49,294.13 कोटी रुपयांची घट झाली.

Advertisement

एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेलसह 4 कंपन्यांना फायदा झाला. दरम्यान पहिल्या-10 कंपन्यांच्या यादीतील ज्या चार कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला, त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचा समावेश आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा झाला. बँकेचे बाजार भांडवल 35,808.09 कोटी रुपयांनी वाढून 12,69,454.42 कोटी रुपये झाले.

Advertisement
Tags :

.