चार कंपन्यांचे बाजारमूल्य 93 हजार कोटींनी वाढले
मुंबई :
गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातील चढ-उतारांदरम्यान, देशातील मुख्य 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकूण 92,995.48 कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
यामध्ये खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक आणि दूरसंचार कंपनी भारती एअरटेल या तेजीमध्ये आघाडीवर आहेत. दुसरीकडे, बाजारातील मंदीमुळे उर्वरित सहा कंपन्यांना तोटा सहन करावा लागला आणि त्यांच्या मूल्यांकनात एकत्रितपणे 49,294.13 कोटी रुपयांची घट झाली.
एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेलसह 4 कंपन्यांना फायदा झाला. दरम्यान पहिल्या-10 कंपन्यांच्या यादीतील ज्या चार कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला, त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांचा समावेश आहे. मूल्यांकनाच्या बाबतीत एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदा झाला. बँकेचे बाजार भांडवल 35,808.09 कोटी रुपयांनी वाढून 12,69,454.42 कोटी रुपये झाले.