7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 96201 कोटीची वाढ
रिलायन्स, बजाज फायनान्स नफ्यात तर भारती एअरटेलचे मूल्य सर्वाधिक घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात मागच्या आठवड्यात 7 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 96201 कोटींची वाढ झालेली दिसून आली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य सर्वाधिक वाढलेले पहायला मिळाले. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 28283 कोटी रुपयांनी मागच्या आठवड्यात वाढले आहे.
मागच्या आठवड्यात शेअर बाजारात चांगली तेजी राहिली होती. दिग्गज कंपनी रिलायन्ससह बजाज फायनान्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, इन्फोसिस यांच्या मूल्यात वाढ झाली व दूरसंचार क्षेत्रातील ंकंपनी भारती एअरटेल, टीसीएस व एलआयसी यांच्या मूल्यात घसरण अनुभवायला मिळाली.
यांच्या मूल्यात वाढ
रिलायन्सचे बाजार भांडवल मूल्य 28283 कोटींनी वाढत 21.20 लाख कोटींवर व बजाज फायनान्सचे 20348 कोटींनी वाढत 6.46 लाख कोटींवर पोहचले. एचडीएफसीचे मूल्य 13611 कोटींसह वाढत 15.49 लाख कोटींवर व आयसीआयसीआयचे मूल्य 13600 कोटींनी वाढत 9.93 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्य 7671 कोटींनी वाढत 5.80 लाख कोटीवर व एसबीआयचे 6415 कोटींसह वधारत 9.04 लाख कोटींवर पोहचले. आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे बाजारमूल्य 6273 कोटींसोबत वाढत 6.48 लाख कोटीवर पोहचले होते.
यांच्या मुल्यात घसरण
दुसरीकडे दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे बाजार मूल्य 35239 कोटींनी कमी होत 11.98 लाख कोटी व एलआयसीचे 4997 कोटींसह घसरत 5.66 लाख कोटींवर घसरले होते. आयटी क्षेत्रातील टीसीएसही मागच्या आठवड्यात नुकसानीत होती. तिचे बाजार भांडवल मूल्य 3763 कोटी रुपयांनी कमी होत 11.36 लाख कोटींवर आले होते