कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूर केंद्रशासित प्रदेश होणार नाही!

06:34 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुकी समुदायांसोबतच्या बैठकीत केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कुकी समुदायाच्या प्रतिनिधींनी 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी दिल्लीत गृह मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कुकी समुदायाने मणिपूरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची मागणी केली. मात्र, केंद्र सरकारने त्यांची ही मागणी नाकारली. मणिपूरला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी संवैधानिक असल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकार मणिपूरवासियांच्या अडचणी समजून घेऊ शकते, परंतु सध्याचे धोरण नवीन केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीला समर्थन देत नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले. दिल्लीत आयोजित करण्यात आलेली ही बैठक शांतता कराराच्या चौकटीत आयोजित करण्यात आली होती. केंद्र सरकार आणि कुकी गटांमधील सुरू असलेल्या संवादाचा भाग म्हणून या बैठकीत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील इतर समुदायांशी व्यापक सल्लामसलत करणे आवश्यक असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट राज्यात कायमस्वरूपी शांतता आणि विश्वास स्थापित करणे आहे. त्यामुळे विविध समुदायांशी संवाद सुरूच राहील, असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत गृह मंत्रालयाने कुकी-झो समुदायाच्या मागणीबाबत स्पष्टीकरणही दिले. नवीन धोरणामुळे सध्या नवीन केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीला पाठिंबा देणे शक्य नाही. केंद्र सरकार समुदायांच्या संमतीने मोठी पावले उचलू इच्छिते. सरकार आणि गटांमधील संवादामुळे राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. सर्व पक्षांनी स्थिरता राखण्यासाठी सहकार्य आणि कराराच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असेही सांगण्यात आले.

मुख्य रस्ता उघडण्यावरही चर्चा

केंद्र सरकारशी झालेली चर्चा 2008 मध्ये झालेल्या मागील कराराचा भाग आहे. तेव्हापासून या चर्चा सुरू आहेत. यावेळीही सर्व पक्षांनी शांतता आणि स्थिरता राखण्याचे मान्य केले. शिवाय, मुख्य रस्ता उघडणे आणि दहशतवादी छावण्या हटवणे यासारख्या मुद्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट दिली होती. पंतप्रधान मोदींनी इम्फाळ आणि चुराचांदपूर येथे दोन वेगवेगळ्या बैठकांना संबोधित केले. यासोबतच, अंदाजे 8,500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा मणिपूरचा आठवा दौरा होता. मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचार सुरू झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article