For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात ३५ टक्क्यांनी वाढ

11:15 AM Jan 07, 2025 IST | Radhika Patil
महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात ३५ टक्क्यांनी वाढ
Advertisement

रत्नागिरी : 

Advertisement

केंद्र शासनाच्या १९७० च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ६५२.६० इतकी होती. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने नवे निकष आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर केलेल्या मोजणीत त्यामध्ये २२५.३७ कि.मी. एवढी वाढ होऊन महाराष्ट्राची किनारपट्टी आता ८७७.९७ कि.मी. इतकी झाली आहे.

केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार ही वाढ जवळपास ३४.५४ टक्के असल्याचे दिसून आले आहे. बंदर उभारणीसह विविध विकासकामे व किनारा मापनाच्या बदललेल्या पद्धतीमुळे किनारपट्टी क्षेत्रात वाढ झाली आहे.
१९७० मध्ये ७,५१६.६० किलोमीटर एवढी होती. नव्या सर्वेक्षणानुसार २०२३-२४ मध्ये ही लांबी ११,०९८.८१ कि.मी. वर पोहोचली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.