For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही ! राजू शेट्टी यांचे आमदार आवाडे यांना जाहीर आव्हान

02:20 PM Nov 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
   तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही   राजू शेट्टी यांचे आमदार आवाडे यांना जाहीर आव्हान
Raju Shetty public challenge MLA Awade
Advertisement

गतवर्षातील 400 व यंदा 3500 पहिला हप्ता देण्याची मागणी, हा दर दिल्यास लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय

कोल्हापूर प्रतिनिधी

आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठिंबा दिलेल्या केंद्र व राज्य सरकारने खताचे दर भरमसाठ वाढविले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मी चळवळीसाठी जगणारा माणूस आहे. मला राज्यातील शेतकरी सुखी झालेले पहायचे आहे. आवाडे मात्र त्यांची दुकानदारी चालविण्यासाठी राजकारण करत आहेत. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल 3500 रूपये दिल्यास मी 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही. आवाडे यांनी स्वत: अथवा त्यांच्या मुलाला खुशाल लोकसभेसाठी ऊभे करावे, याला माझा पाठिंबा असेल, अशी स्पष्टोक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी केली.

Advertisement

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चळवळीच्या माध्यमातून शेट्टी राजकारण करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला होता. या आरोपाला शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिले. शेट्टी म्हणाले, आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल 3500 रूपये दिल्यास मी 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना शेतकरी चळवळीवर गरळ ओकण्याचे व शेतकऱ्यांच्या मनामध्ये भिती निर्माण करण्याचे काम आमदार आवाडे करत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, जिह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे हे मी नाकारणार नाही. मात्र आमदार आवाडे भिती दाखवितात तशी परिस्थिती नसून जिल्हयातील धरणामध्ये गेल्या वर्षी असणारा पाणीसाठा व आजच्या दिवशी यावर्षी असणारा पाणीसाठा याची परिस्थतीत पाहिल्यास आणि जर काटकसरीने पाणी सोडण्याचे नियोजन केल्यास मे अखेर पर्यंत पाणी पुरवठा होवू शकतो. मात्र राज्यकर्त्यांनी सरकारमध्ये असलेला आपला अधिकार वापरून शेतकऱ्यांचा काटा काढायचा या सुडापोटी धरणामध्ये पाणीसाठा असतानाही धरणातून पाणी न सोडणे व कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करणे यासारखे प्रकार सुरु केले आहेत. यामुळे मी ऊस परिषदेमध्येच शेतकऱ्यांना सांगितले आहे की ज्वारी व गव्हाचे दर वाढू लागल्याने शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्र कमी करून गहू व ज्वारीचे पिक करावे असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.