केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केजरीवाल सरकारने दिल्ली विधानसभेतून विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 54 मते मिळवून बहुमत सिद्ध केल्यानंतर सभागृहाचे कामकाज सोमवार 19 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य घोटाळ्यावर पुन्हा एकदा सरकारची भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर शाब्दिक तोफ डागली. दिल्ली सरकारच्या कामकाजात केंद्र सरकार वारंवार हस्तक्षेप करत असल्याचा हल्लाबोल करताना दिल्लीतील ऊग्णालयात औषध बंद करण्याचे काम भाजपने केले. हॉस्पिटलमध्ये स्लिप बनवणाऱ्यांना काढून टाकण्यात आले. दिल्लीत फरिश्ते योजना बंद करण्यात आली, असेही त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले.
विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणण्याची गरज नव्हती, असा दावा केला. केजरीवाल सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. दिल्लीतील जनतेचे लक्ष वळवण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी आमदारांच्या खरेदीबाबत केलेल्या आरोपाबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे दोन मंत्री आणि एक खासदार तुऊंगात आहेत. या प्रकरणात कमिशन लक्षणीय वाढले होते. निवासी भागात दारूची दुकाने सुरू झाली, असेही त्यांनी सांगितले.