For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के. कवित यांनी याचिका घेतली मागे

06:39 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
के  कवित यांनी याचिका घेतली मागे
Advertisement

ईडीच्या समन्सला दिले होते आव्हान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांनी दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून बजावण्यात आलेल्या समन्सला आव्हान देणारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मंगळवारी मागे घेतली आहे.

Advertisement

बीआरएस आमदार के. कविता यांनी दिल्ली अबकारी धोरण आणि अंमलबजावणीत लाभ मिळविण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमवेत आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मिळून कट रचला होता. याच्या बदल्यात कविता यांनी आप नेत्यांना 100 कोटी रुपये दिले होते असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. कविता यांना याच घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 15 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे.

कविता यांना 23 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने हैदराबाद येथील कविता यांच्या निवासस्थानी जात झडती घेतल्यावर त्यांना अटक केली होती. दिल्ली अबकारी धोरण 2021-22 ची निर्मिती आणि अंमलबजावणीत भ्रष्टाचार सतेच कटाच्या कृत्यांमुळे आम आदमी पक्षाला विक्रेत्यांकडून लाचेच्या स्वरुपात मोठी रक्कम मिळाल्याचे ईडीकडून म्हटले गेले होते.

ईडीने आजवर याप्रकरणी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, मुंबईसमवेत अनेक शहरांमध्ये एकूण 245 ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात आप नेते मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि विजय नायर यांचाही समावेश आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अलिकडेच याप्रकरणी जामीन घ्यावा लागला आहे.

Advertisement
Tags :

.