महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘जिओ’ने जोडले 4.24 कोटी ग्राहक

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंबानींच्या जिओचा डंका सुरुच : आर्थिक वर्ष 2023-24 मधील आकडेवारीचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी, रिलायन्स जिओने ग्राहकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये जिओने 4.24 कोटी नवीन ग्राहक जोडले. आता कंपनीचे एकूण 48.18 कोटी ग्राहक आहेत. अहवालात असेही समोर आले आहे की जिओचे 10.8 कोटी पेक्षा जास्त ग्राहक 5 जी नेटवर्क वापरत आहेत, ज्याला जिओ ट्यू 5 जी म्हणतात. जिओकडे देशात 5 जी नेटवर्कची क्षमता 85 टक्के आहे. तसेच, भारतातील एकूण डेटा वापरापैकी 60 टक्के जिओचा वाटा आहे.

जिओ देशभरात 5 जी नेटवर्क आणणार

रिलायन्स जिओने सांगितले की त्यांनी देशभरात 5 जी नेटवर्क खूप लवकर आणण्याच्या तयारीत आहे. आता जिओच्या एकूण डेटापैकी 30 टक्के डेटा 5 जी  नेटवर्कवर चालतो. आणि हा 5जी डेटा आहे, तो जिओच्या 5 जी आणि 4 जी नेटवर्कच्या संयोगाने चालू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. रिलायन्सने पुढे सांगितले की, जिओची वेगवान इंटरनेट सेवा, जिओ एअर फायबर लोकांच्या पसंतीस पडली आहे. आतापर्यंत त्याचे 1 कोटी 20 लाख ग्राहक आहेत. ही सेवा सध्या 5900 शहरांमध्ये उपलब्ध असून लवकरच ती संपूर्ण देशात उपलब्ध होणार आहे. जिओचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जिओभारत फोननेही बाजारात धुमाकूळ घातला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article