झारखंडच्या अर्थमंत्र्यांनी सरकारी सुरक्षा नाकारली
06:22 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ रांची
Advertisement
झारखंड सरकारमधील काँग्रेस कोट्यातील सर्वात ज्येष्ठ मंत्री आणि सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते राधा कृष्ण किशोर यांनी सर्वांना धक्का दिला आहे. किशोर यांनी शुक्रवारी आपल्या सुरक्षेसाठी तैनात केलेले 16 सुरक्षा रक्षक आणि त्यांना नेमून दिलेली तीन सुरक्षा वाहने राज्य सरकारकडे परत केली. पोलीस मुख्यालयाने आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अर्थमंत्री राधा कृष्ण किशोर नाराज असल्याचे बोलले जात आहे. जरी त्यांनी हे उघडपणे सांगितले नसले तरी, त्यांनी अलीकडेच पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आपल्या ताफ्यासाठी अतिरिक्त वाहनाची विनंती केली होती. यावर कोणताही निर्णय न झाल्याने राधा कृष्ण किशोर संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात केलेले कर्मचारी आणि वाहने परत केली आहेत.
Advertisement
Advertisement