युद्ध रोखण्यासाठी इस्लामिक देशाचा पुढाकार
इराणचे विदेशमंत्री करणार भारत, पाकिस्तानचा दौरा
इराण
इराण या इस्लामिक देशाने आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव् युद्ध रोखण्याचा विडा उचलला आहे. इराणचे विदेशमंत्री अब्बास अरागची हे चालू आठवड्यात भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार असून यामागे क्षेत्रीय युद्ध रोखण्याचा उद्देश असल्याचे इराणच्या विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.
अरागची हे उच्चपदस्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज पाकिस्तानात पोहोचणार आहेत. यानंतर अरागची हे भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रसज्ज देशांदरम्यान वाढता तणाव कमी करणे हा दौऱ्याचा उद्देश असल्याचे इराणकडून सांगण्यात आले. भारत आणि पाकिस्तान या दोघांसोबत चांगले संबंध असणाऱ्या मोजक्या देशांमध्ये इराणचा समावेश आहे. इराण हा पाकिस्तानच्या तुलनेत भारताशी अधिक घनिष्ठ संबंध ठेवून आहे.