कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘या’मुळे रुपया कमकुवत होतोय?

06:44 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रिस्टोफर वूड यांच्या अहवालामधून माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जेफरीज शेअर बाजाराचे तज्ञ क्रिस्टोफर वूड यांनी अहवालात म्हटले आहे की, ‘भारतीय शेअर बाजाराने यावर्षी इतर देशांच्या तुलनेत कमी कामगिरी केली आहे. वुड म्हणतात की देशाच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता असे दिसते की रुपयाची घसरण आता थांबवता येईल. यावर्षी, इतर उदयोन्मुख देशांच्या चलनांमध्ये रुपया सर्वात कमकुवत राहिला.’

भारतीय शेअर बाजाराने यावर्षी एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्सपेक्षा 27 टक्के कमी कामगिरी केली आहे. याचा अर्थ असा की इतर देश पुढे आहेत तर भारत मागे पडला आहे. तथापि, हे पूर्णपणे वाईट नाही, कारण भारतातील देशांतर्गत गुंतवणूकदार सतत शेअर्स खरेदी करत आहेत, म्हणूनच बाजार पूर्णपणे कोसळलेला नाही असेही वुड यांनी सांगितले.

चालू खात्यातील तूट ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचू शकते?

वुड यांच्या मते, येत्या वर्षात (2025-26) भारताची चालू खात्यातील तूट जीडीपीच्या फक्त 0.5 टक्के पर्यंत कमी होऊ शकते. गेल्या 20 वर्षांतील ही सर्वात कमी असेल. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की भारताकडे सध्या 690 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे, जो देशाच्या 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे.

परंतु वुड म्हणतात की रुपया स्थिर ठेवण्यात एक मोठा धोका आहे. तो म्हणजे राज्य सरकारे निवडणुका जिंकण्यासाठी देत असलेल्या मोफत सुविधा आणि सवलती. त्यांच्या मते, यामुळे राज्यांना खूप पैसे खर्च करावे लागत आहेत.

केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, परंतु राज्य सरकारांची स्थिती कमकुवत होत आहे कारण गेल्या दोन वर्षांत राज्यांनी अनेक लोकप्रिय (स्वार्थासाठी किंवा मतांसाठी) योजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे चिंता निर्माण होते.

तर शेअर बाजार धोक्यात येईल का?

या वर्षी सरकारने 22 सप्टेंबरपासून व्याजदर कमी करणे, पत वाढवणे आणि जीएसटी दर कमी करणे यासह अनेक पावले उचलली आहेत. या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्थेला फायदा होत आहे का हे येत्या काही महिन्यांत कळेल. जर या उपाययोजनांमुळे जीडीपी वाढीला चालना मिळाली नाही, तर शेअर बाजाराचे उच्च मूल्यांकन धोक्यात येऊ शकते असेही वुड म्हणतात.

भारतीय आयटी क्षेत्रासाठी एआय आव्हान ?

वुड म्हणाले की एआयचा भारताच्या आयटी सेवा क्षेत्रावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. सप्टेंबर 2025 च्या तिमाहीत, भारतीय आयटी कंपन्यांचे उत्पन्न केवळ 1.6टक्क्यांनी वाढले आहे, जे खूपच कमी आहे. यामुळे या क्षेत्राच्या शेअर्समध्ये घट झाली आहे आणि मूल्यांकन कमी झाले आहे. उलट, त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की भारतातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (जीसीसी) देशाला बळकटी देत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article