For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखर उत्पादन कमी राहण्याचे संकेत

06:58 AM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
साखर उत्पादन कमी राहण्याचे संकेत
Advertisement

इस्माच्या अहवालातून स्पष्ट : किंमतीवर परिणाम नाही : महासंचालक दीपक बल्लानींचा विश्वास 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वर्ष 2024-25 या कालावधीत साखरेचे उत्पादन हे 2.64 कोटी टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, परंतु पुरेसा साठा असल्याने किंमती आणि पुरवठ्यावर तसा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचे संकेत आहेत. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(इस्मा) यांनी त्यांच्या अहवालामधून ही माहिती दिली आहे. उत्पादनात 16 टक्क्यांची मोठी घट नोंदवली जाण्याची शक्यताही दरम्यान व्यक्त केली आहे. सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या 2024-25 हंगामात भारताचे निव्वळ साखर उत्पादन सुमारे 2.64 कोटी टन असण्याचा अंदाज आहे. जानेवारीत 2.72 कोटी टनांच्या अंदाजापेक्षा हे उद्दिष्ट कमी असेल.

Advertisement

साखर उत्पादनात घट होण्याचे कारण उत्तर प्रदेशातील ऊसापासून होणारे साखरेचे उत्पादन कमी होणे आणि महाराष्ट्रातही कमी उत्पादन होणे आहे. तथापि, याचा साखरेच्या किमतीवर व पुरवठ्यावर परिणाम होणार नाही कारण हंगामाच्या शेवटी 54 लाख टन साखर शिल्लक राहील असेही भाकीत यावेळी इस्माच्या अहवालात करण्यात आले आहे. वर्ष 2024-25 सत्राच्या शेवटी, साखरेचा साठा 45 लाख टनांच्या मानक दोन महिन्यांच्या उत्पादन गरजेपेक्षा जास्त असेल. जानेवारीमध्ये इस्माने सांगितले होते की, 3.7 लाख टन इथेनॉलमध्ये वापरले जात असले तरी 2.72 कोटी टन साखर शुद्ध स्वरूपात तयार होईल. त्यांनी आता त्यांचा अंदाज 2.64 कोटी टन केला आहे आणि त्यानुसार 3.5 लाख टन साखर इथेनॉलमध्ये वापरली जाऊ शकते.

ऊस उत्पादन सकारात्मक होईल : महासंचालक बल्लानी

‘2025-26 सत्रासाठी खूप सोपा ओपनिंग स्टॉक राहणार आहे. तसेच  2024 मध्ये, चांगल्या नैऋत्य मान्सूनमुळे जलाशयांमध्ये पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने उसाचे उत्पादन खूप चांगले होण्याची अपेक्षा आहे. 2025-26 हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पेरणीत सुधारणा होण्याची शक्यता आहे,’ असे इस्माचे महासंचालक दीपक बल्लानी यांनी म्हटले आहे.

2025-26 चा ऊस तोडणीचा हंगाम ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होईल. सत्राच्या शेवटी उपलब्ध असलेला साठा सुमारे 54 लाख टन असण्याचा अंदाज आहे जो पुरेसा आहे. बल्लानी म्हणाले, ‘शिवाय, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये बदलत्या ऊस जातींचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. यामुळे 2025-26 मध्ये साखर सत्रात या क्षेत्रांमधून चांगले उत्पादन आणि चांगली वसुली होईल.’

एकूण साखरेचा वापर 2.8 कोटी टन?

इस्माचा अंदाज आहे की 2024-25 सत्रात एकूण साखरेचा वापर सुमारे 2.8 कोटी टन असण्याची शक्यता आहे, जो गेल्या वर्षीच्या 2.9 कोटी टनांपेक्षा कमी असेल. याचे कारण असे की गेल्या वर्षी निवडणुकीमुळे साखरेची विक्री वाढली होती, परंतु यावर्षी निवडणूक नाही. साखर कारखानदारांचा अंदाज आहे की या वर्षी साखरेचा किरकोळ भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 43-44 रुपये प्रति किलो असू शकतो.

बल्लानी म्हणाले, ‘या सत्रातील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे गेल्या वर्षीच्या साखरेच्या थकबाकीपैकी सुमारे 99.9 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत या सत्रातील सुमारे 80 टक्के उसाची थकबाकी अदा करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.