For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताकडून शांततेचे आवाहन

06:28 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताकडून शांततेचे आवाहन
Advertisement

व्हेनेझुएलामधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर भर : परराष्ट्र विभागाकडून निवेदन जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेच्या सैन्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना केलेल्या अटकेबद्दल आणि तेथील तणावपूर्ण परिस्थितीबद्दल भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी एक अधिकृत निवेदन जारी करत भारत व्हेनेझुएलातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनात अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन्ही देशांना वादग्रस्त मुद्दे संवादाद्वारे शांततेने सोडवण्याचे आवाहन केले. प्रादेशिक स्थिरता आणि आपल्या लोकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे आवश्यक असून भारत सतत परिस्थितीचे मूल्यांकन करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवास नियमावली जारी

भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी कठोर प्रवास नियमावली जारी केली आहे. भारतीयांना व्हेनेझुएलाचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तेथे राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवण्याचे आणि अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्हेनेझुएलातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि प्रादेशिक स्थिरतेबद्दल भारत पूर्णपणे चिंतित असल्याचे या निवेदनाद्वारे आणि सल्लागाराद्वारे भारताने स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतची परिस्थिती देखील स्पष्ट केली. कराकसमधील भारतीय दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत भारतीयांना पूर्ण मदत करण्याचे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दूतावासाला देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.