देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेब्रुवारीमध्ये देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, देशांतर्गत प्रवाशांची संख्या वर्षभरात 4.8 टक्क्यांनी वाढून 126.48 लाख झाली आहे, तर याच कालावधीत 1.55 लाखांहून अधिक प्रवाशांना उड्डाण विलंबाचा फटका बसला आहे. त्याचवेळी, फेब्रुवारीमध्ये, एअर इंडियाचा बाजार हिस्सा 12.2 टक्क्यांवरून 12.8 टक्क्यांपर्यंत वाढला, तर इंडिगोचा बाजार हिस्सा जानेवारीच्या 60.2 टक्क्यांवरून 60.1 टक्क्यांपर्यंत कमी झाला अशी माहिती शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार देण्यात आली आहे.
देशांतर्गत हवाई वाहतूक फेब्रुवारीमध्ये वाढून 126.48 लाख झाली, जी वर्षभरापूर्वी 120.69 लाख होती. मात्र, जानेवारीत वाहतूक 1.31 कोटींहून कमी नोंदवली गेली. जानेवारी-फेब्रुवारी 2024 या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्या 257.78 लाख होती, जी मागील वर्षी याच कालावधीत 246.11 लाख होती, ज्यात वार्षिक 4.74 टक्के आणि मासिक 4.80 टक्के वाढ नोंदवली गेली.
डीजीसीएने म्हटले आहे, उड्डाण रद्द झाल्यामुळे 29143 प्रवाशांचे हाल झाले हेते. फेब्रुवारीमध्ये उड्डाण विलंबामुळे 1,55,387 प्रवाशांवर परिणाम झाला आणि नियोजित वाहकाने सुविधेसाठी 222.11 लाख रुपये खर्च केले. डीजीसीएने असेही म्हटले आहे की उड्डाण रद्द केल्यामुळे 29,143 प्रवासी प्रभावित झाले आणि एअरलाइन्सने नुकसानभरपाई आणि सुविधांसाठी 99.96 लाख रुपये खर्च केले. गेल्या महिन्यात, बोर्डिंग नाकारल्यामुळे एकूण 917 प्रवासी प्रभावित झाले होते आणि एअरलाइन्सने या संदर्भात भरपाई आणि सुविधांसाठी खर्च केलेली रक्कम 78.19 लाख होती.