For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्पादनाच्या पीएमआयमध्ये सुधारणा

06:21 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्पादनाच्या पीएमआयमध्ये सुधारणा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

देशातील वाढती निर्यात आणि वाढत्या रोजगारामुळे भारताचा उत्पादन पीएमआय एप्रिलमध्ये 54.7 पर्यंत सुधारला आहे. दरम्यान, पश्चिम आशियातील संकटामुळे वाढणाऱ्या खर्चाचे आव्हान कायम आहे. निर्यात तेजीमुळे एप्रिलमध्ये खासगी क्षेत्रातील उत्पादनामधील उलाढालीचा वेग वाढला आहे.

पश्चिम आशियातील चालू संकटामुळे मार्चमध्ये ते 4 वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरले होते. एस अँड पी ग्लोबलने संकलित केलेला एचएसबीसीचा इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) सोमवारी जाहीर झाला, जो मार्चमधील 53.9 वरून एप्रिलमध्ये 54.7 पर्यंत वाढला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

हा निर्देशांक उत्पादन आउटपुटमधील मासिक बदल मोजतो. तथापि, नवीन ऑर्डर, आउटपुट, रोजगार, पुरवठादार वितरण कालावधी आणि खरेदी स्टॉक निर्देशांकांची भारित सरासरी गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या 55.9 च्या फ्लॅश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयपेक्षा कमी होती. उत्पादन पीएमआयचा आकडा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असणे हे क्रियाकलापांमधील विस्तार दर्शवते, तर त्यापेक्षा कमी असणे हे आकुंचन दर्शवते. हा निर्देशांक सलग 54 व्या महिन्यासाठी विस्तार क्षेत्रात राहिला आहे.

ही दुसरी सर्वात संथ सुधारणा : भंडारी

एचएसबीसीचे भारतातील मुख्य अर्थतज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले, ‘भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय मार्चमधील 53.9 वरून एप्रिलमध्ये 54.7 पर्यंत वाढला. तरीही, गेल्या जवळपास 4 वर्षांतील कामकाजाच्या परिस्थितीत झालेली ही दुसरी सर्वात संथ सुधारणा आहे. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम अधिक स्पष्ट होत आहे, विशेषत: महागाईवर. ऑगस्ट 2022 नंतर कच्च्या मालाच्या किमती सर्वात जलद गतीने वाढत आहेत आणि उत्पादित वस्तूंच्या किमती गेल्या 6 महिन्यांतील सर्वात जलद गतीने वाढत आहेत.“

दरम्यान, पहिल्या आर्थिक तिमाहीच्या सुरुवातीला नवीन निर्यातीच्या मागण्यांमध्ये मोठी वाढ झाली आणि वाढीचा दर 7 महिन्यांच्या उच्चांकावर होता. अॅल्युमिनियम, रसायने, विद्युत घटक, इंधन, चामडे, पेट्रोलियम उत्पादने आणि रबर यांच्या वाढलेल्या किमतींमुळे एप्रिलमध्ये सरासरी खर्चाचा भार आणखी वाढला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी याचे कारण पश्चिम आशियातील युद्ध असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :

.