कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पवार साहेबांशी चर्चा झाल्यावरच अधिकृत बोलेन

05:58 PM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

पाचगणी : 

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शरद पवार यांनी एका मुलाखतीत सुप्रिया सुळे यांच्यावर या निर्णयाचा अधिकार सोपवल्याचे संकेत दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या मुद्यावरून ठोस आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Advertisement

मी अद्याप हे कुठेही वाचलेले नाही. या विधानाबाबत मी पूर्ण माहिती घेईन आणि त्यानंतरच काही बोलू शकते,‘ असे वक्तव्य करत सुप्रिया सुळे यांनी चर्चांना अधिकच हवा दिली आहे. तसेच, पवार कुटुंबातील राजकीय हालचालींवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘जोपर्यंत माझी शरद पवार साहेबांशी चर्चा होत नाही, तोपर्यंत मी याबाबत काहीही सांगू शकत नाही.’

अजित पवार गटाशी एकत्र येण्याबाबत विचारले असता, ‘माझ्यापर्यंत अजून अशी कोणतीही माहिती पोहोचलेली नाही,’ असे स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

इंडिया आघाडीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘युद्धजन्य परिस्थितीत आम्ही कोणताही राजकारण करणार नाही. मी स्वत: या निर्णयामध्ये भारत सरकारच्या बाजूने उभी आहे.’

राजकीय विश्लेषकांच्या मते, सुप्रिया सुळे यांच्या या ठोस भूमिकेमुळे पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चेचे वादळ निर्माण झाले आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर राष्ट्रवादीच्या गटांमध्ये एकत्रीकरणाची चर्चा रंगली असली, तरी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याद्वारे या चर्चांना आळा घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

आता सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील संवादानंतर या चर्चांना काय वळण मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article