For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:10 AM Jan 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

Advertisement

लग्न होण्यास विलंब होतो किंवा लग्न ठरल्यानंतरही नाते तुटते. अनेकवेळा असे घडते की, नातेसंबंध येत असतात पण काम होत नाही. त्यामुळे अशा समस्यांना तोंड देण्यासाठी ज्योतिषशास्त्राने काही खास उपाय सुचवले आहेत. या ज्योतिषीय उपायांचे पालन केल्याने विवाहाच्या मार्गातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि विवाहाची शुभ शक्यता निर्माण होऊ लागते. गुरुवारी केलेले हे उपाय खूप फायदेशीर मानले जातात आणि त्यांचे परिणाम लवकर प्राप्त होतात. वरील यंत्र हे शीघ्र विवाह यंत्र आहे. मुलगा किंवा मुलगी जे विवाहोत्सुक आहेत त्यांनी हे यंत्र भोजपत्रावर (झाडाची साल जी काष्टौषधीच्या दुकानात मिळते.) अष्टगंधाने डाळिंबाच्या काडीने काढावे. पूजा करावी आणि फ्रेम करून जवळ ठेवावे. लग्न हे दोन व्यक्तेमधील जीवनाचे बंधन आहे. लग्नानंतर एक मुलगा आणि मुलगी नात्यात येतात आणि एक कुटुंब तयार करतात. दोघांचेही कुटुंब त्यांच्याशी जोडले जाते. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आदर्श जोडीदाराच्या शोधात असतो आणि लग्नाचा निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेतला जातो. जुन्या काळात, कुटुंबे आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी एक आदर्श जीवनसाथी निवडत असत. आजही कुटुंबातील वडीलधारी मंडळीच नाती ठरवतात, याला अरेंज्ड मॅरेज म्हणतात. पण काळानुसार प्रेमविवाहाचा ट्रेंड वाढला आहे. लव्ह मॅरेज, जसे नावच स्पष्टपणे सांगतो. एक असा विवाह आहे ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी आधीच एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांना त्यांचा जीवनसाथी म्हणून निवडतात. प्रेमविवाहात वधू आणि वर एकमेकांना आधीच ओळखतात. कुटुंबाच्या संमतीने किंवा त्याशिवाय ते एकमेकांशी लग्न करतात. हे यशस्वी व्हावे म्हणून खालचे यंत्र दिले आहे. ते तांब्याच्या पत्र्यावर काढून प्रेम करून पूजेत ठेवावे.

गुरूवारी कोणत्याही गाईसाठी गव्हाच्या पिठाचे दोन पेढे किंवा गोळे करून त्यावर थोडी हळद लावावी. तसेच थोडासा गूळ आणि हरभरा डाळ घालून गायीला खाऊ घाला. मुलगा आणि मुलगी दोघेही हा उपाय करू शकतात. शक्मय असल्यास लाल गाईला चपातीमध्ये गुंडाळलेल्या गुळासोबत खाऊ घाला, असे केल्याने विवाहातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील.

Advertisement

लवकर विवाहासाठी कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेला वटवृक्षाला जल अर्पण करावे, तुपाचा दिवा लावावा आणि 108 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने लग्नाची इच्छा पूर्ण होते आणि लवकरच लग्न होते.

राक्षसांचे गुरू भगवान शुक्र हे प्रेम, विवाह, प्रणय आणि आनंदाचे कारण मानले जाते. कुंडलीत बलवान शुक्र असल्यामुळे अविवाहित मुलांचे लग्न लवकर होते. याशिवाय विवाह, घर आणि प्रेम गृहात उपस्थित ग्रहांचाही विचार केला जातो. ज्योतिषी मुलांना लवकर लग्नासाठी त्यांच्या कुंडलीत शुक्र मजबूत करण्याचा सल्ला देतात. शुक्रामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर शुक्रवारी स्नान करून ध्यान करून भगवान शिवाला गंगाजलात काळे तीळ मिसळून अभिषेक करा. हा उपाय केल्याने कुंडलीत केवळ शुक्रच बलवान होत नाही तर इतर अशुभ ग्रहांचा प्रभावही कमी होतो.

मेष

भाग्याची पूर्ण साथ मिळेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. घरात मंगल कार्य होण्याची शक्मयता आहे. विवाहोत्सुक व्यक्तींना अनुकूल काळ असेल. वैवाहिक जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. वैवाहिक जीवन आनंदमय असेल. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारीमुळे त्रास होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा करत असताना चर्चेचे रूपांतर भांडणात होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

उपाय : मारुतीला तीन बुंदीचे लाडू अर्पण करावे.

वृषभ

केलेल्या कामाचा योग्य तो परतावा मिळेल. मन जरी उत्साहाने भरलेले असले तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असेल. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. खाण्यापिण्याच्या आवडींना जपाल. पण कुपथ्य होऊ देऊ नका. प्रवास करण्याचा विचार करत असाल तर सध्या टाळलेला बरा. लहान भावंडांशी काही कारणाने मतभेद होऊ शकतात. नोकरीत पगार वाढ आणि कामाचे कौतुक होऊ शकते.

उपाय :  देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा.

मिथुन

स्वभावामध्ये थोडा बदल केला तर बरीच कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नाही. आत्मविश्वासात वाढ होईल. मित्रमंडळींसोबत एखाद्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकाल. धनप्राप्ती सर्वसाधारण असेल. व्यावसायिकांनी जास्त अपेक्षा करू नयेत. या काळात कोणाचीही चेष्टा करायला जाऊ नका. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळेल.

उपाय : लहान मुलांना आंबट-गोड मिठाई वाटावी.

कर्क

तब्येतीला जपावे. बाहेरचे खाणे-पिणे आरोग्य बिघडवू शकते. गॅसेस आणि पोट बिघडणे किंवा पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. कुटुंबातील काही व्यक्तींच्या आतताई स्वभावामुळे मन दुखावले जाण्याची शक्मयता आहे. एखाद्या योजनेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता आहे, सावध राहावे. प्रेमसंबंधात वृद्धी होईल. छोट्या गुंतवणुकीतून लाभाची शक्मयता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगले अनुभव येतील.

उपाय : आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे.

सिंह

रागावर नियंत्रण ठेवले नाही तर नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. आपल्या कृती आणि वाणीवर संयम ठेवलाच पाहिजे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर वैद्यकीय उपचार करून घेतले तर शीघ्र आराम मिळेल. या काळात पैशांच्या बाबतीत थोडी काळजी वाटू शकते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती अनुभवायला येऊ शकते. प्रवासाचे उत्तम योग आहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल.

उपाय :  केशर चंदनाचा टिळा लावावा.

कन्या

संसर्गजन्य रोगांपासून सावध राहणे शहाणपणाचे ठरेल. अंगदुखी, डोकेदुखीसारखे आजार त्रास देऊ शकतात. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. अपेक्षा नाही अशा ठिकाणाहून आर्थिक मदत मिळू शकते. शेजाऱ्यांच्या मदतीमुळे एखादे काम पूर्ण कराल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत चांगले संकेत आहेत. प्रेम संबंधात वाढ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना जास्त मेहनत करण्याची गरज आहे.

उपाय :  गाईला गूळ-चपाती खाऊ घाला.

तूळ

प्रयत्नांना जर भाग्याची साथ मिळाली तर दुग्धशर्करा योग होतो, याची प्रचिती या काळात येण्याची शक्मयता आहे. तीर्थयात्रेचा योग होत आहे. मनात धार्मिक विचार येतील. तब्येतीची काळजी करू नका. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रभावी वाणीने लोक आकर्षित होतील. प्रवासात चांगल्या घटना घडू शकतात. लेखी व्यवहारात यश मिळेल. जमीन आणि वाहन यादृष्टीने उत्तम योग होत आहेत. शेअर बाजारापासून दूर रहा. नोकरीत बेचैनी जाणवेल.

उपाय : कर्पूर होम करावा.

वृश्चिक

तब्येतीच्या काही तक्रारी कमी झाल्यामुळे सुटकेचा श्वास घ्याल. आरोग्य चांगले झाल्याने उत्साहात वाढ होईल. कामे आत्मविश्वासपूर्वक कराल. ज्यामुळे पैशांचा प्रवाह चांगला असेल. परिवारात मागे घडलेल्या कटू घटना निवळल्याने आनंददायी वातावरण असेल. मनपसंत खाण्यापिण्याकडे तुमचा कल असेल. भावंडांकडून चांगली बातमी कळण्याची शक्मयता आहे. शेअर बाजारासारख्या गुंतवणुकीपासून दूर रहा.

उपाय :  देवीच्या मंदिरात कोहाळ्याचे दान द्यावे.

धनु

शैक्षणिक कार्याशी संबंधित लोकांना अनेक संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. आरोग्याविषयी योग्य तो निर्णय घेऊन स्वस्थ राहण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. पैशाची आवक चांगली असेल. व्यावसायिकांना तेजीचा अनुभव येईल. प्रवास टाळणे अशक्मय असेल तर पिवळी मिठाई खाऊन मग करावा. जमिनीचे व्यवहार तूर्तास टाळलेले बरे. आईच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. नोकरी करणाऱ्यांना मनाविऊद्ध काम करावे लागेल.

उपाय : सुकलेले नारळ जलप्रवाहीत करावे.

मकर

उत्साहात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे पण प्रयत्नांची कास सोडू नये. आरोग्य चांगले राहील. व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक तंगी जाणवू शकते. कुटुंबात वाद होणार नाही, त्याची काळजी घ्या. भावंडाबरोबर किंवा शेजाऱ्यांबरोबर असलेले नाते बिघडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. शेअर बाजारापासून धोका संभवतो. नोकरदार वर्गाला पगार वाढीची शक्मयता आहे.

उपाय : उडदाचे दान द्यावे.

कुंभ

वातावरणात आलेल्या बदलाचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. लहान-मोठे आजार त्रास देतील. वैद्यकीय मदत घेण्यासाठी वेळ लावू नये. घरातील वातावरण काहीसे बिघडलेले जाणवेल. कागदोपत्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे असेल. जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होण्याची शक्मयता आहे. वाहन दुऊस्तीची वेळ येऊ शकते. मौजमजेकडे जास्त लक्ष असेल. नोकरदार वर्गाने अधिकाऱ्यांची मर्जी राखणे आवश्यक आहे.

उपाय : मंदिरात जोड केळ्याचे दान द्यावे.

मीन

लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा उचलणार नाहीत, याची काळजी घ्या. दोस्ती खात्यात किंवा ओळखी खातर तुमच्याकडून कामे करवून घेतली जाऊ शकतात. तब्येत नाजूक असेल. पैशांची आवक तुलनेने कमी झाल्याने थोडी चिंता वाटू शकते. स्थावर मालमत्तेच्या संदर्भात चांगले योग आहेत. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्मयता आहे. धार्मिक कारणास्तव प्रवासाचा विचार कराल. समाजात मानसन्मान मिळेल.

उपाय : गाईला पेढा भरवावा.

Advertisement
Tags :

.