महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एलअँडटीच्या कामकाजाचा हेस्कॉमला फटका

11:13 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूर्वसूचना न देताच ठिकठिकाणी केली खोदाई 

Advertisement

बेळगाव : एलअँडटी कंपनीकडून जलवाहिन्या घालण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. परंतु हेस्कॉमला न कळविता खोदकाम केले जात असल्यामुळे 11 केव्ही भूमिगत विद्युत वाहिन्यांना नुकसान पोहोचत आहे. मागील एक महिन्यात तब्बल 15 ते 20 ठिकाणी विद्युत वाहिन्यांचे नुकसान करण्यात आले असून यामुळे हेस्कॉमला आर्थिक फटका तर बसतच आहे. त्याचबरोबर शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिकांची नाराजीही ओढवून घेतली जात आहे.हेस्कॉमने तीन वर्षांपूर्वी उच्च दाबाच्या भूमिगत वीजवाहिन्या घातल्या होत्या. जमिनीपासून चार ते पाच फुटावर या विद्युत वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. 11 केव्ही क्षमतेच्या या विद्युत वाहिन्या घालण्यासाठी हेस्कॉमला 330 कोटी रुपयांचा निधी लागला होता.

Advertisement

सध्या एलअँडटी कंपनीकडून जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई केली जात आहे. खोदाई करताना उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्यांना स्पर्श झाल्यानंतर ती वाहिनी निकामी होते. वाहिनी निकामी झाल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा ताबडतोब बंद होत आहे. शहरात एलअँडटी, स्मार्ट सिटी तसेच महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी गटारी, सीडीवर्क यासह इतर बांधकामासाठी खोदाई केली जाते. खोदाई करण्यापूर्वी संबंधित विभागातील हेस्कॉम अधिकाऱ्यांना कळविल्यास भूमिगत विद्युतवाहिनी नेमकी कोणत्या भागातून घालण्यात आली आहे, याची माहिती ते सांगू शकतात. यामुळे विद्युत वाहिनींना धोका पोहोचणार नाही. परंतु असे न करता थेट खोदाई सुरू केली जात असल्याने मागील महिन्याभरात 15 ते 20 ठिकाणी विद्युत वाहिनी निकामी झाल्याचे प्रकार घडले आहेत.

दुरुस्तीसाठी 8 ते 10 हजारांचा खर्च

भूमिगत विद्युत वाहिनी निकामी झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी 8 ते 10 हजारांचा खर्च येतो. त्याचबरोबर वारंवार जॉईंट दिल्याने विद्युत वाहिन्यांचे आर्युमान कमी होते. विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी केवळ दोनच कर्मचारी असल्याने त्यांच्यावरही भार पडत आहे. ज्या विभागाने विद्युत वाहिनीला धोका पोहोचविला त्यांनाच स्वखर्चाने दुरुस्ती करावी लागते. एखाद्या व्यक्तीने बांधकामावेळी धोका पोहोचविल्यास त्याच्याकडून ती रक्कम हेस्कॉमकडून वसूल केली जाते. परंतु यामध्ये वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा होऊन नागरिक मात्र होरपळले जातात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article