कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Rain Effect On Crop: जिल्ह्यात 9378 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, भात पिकाला फटका

03:36 PM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काही भागात शेतामध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नूकसान झाले

Advertisement

By : इंद्रजित गडकरी

Advertisement

कोल्हापूर : ऑगस्टच्या सूरुवातीपासूनच जिह्यात जोरदार पाऊस होता. विशेषत: 16 ते 21 या कालावधीत जोर जास्त होता. हवामान विभागाने या काळात रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे अनेक वेळा उघडले गेले, यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला.

16 ऑगस्ट रोजी राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले. 5784 क्युसेक विसर्ग झाला. नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ दिसून आली. राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यातील ऊस, भात, सोयाबिन या पिकांचे नूकसान झाले.

काही भागात शेतामध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नूकसान झाले. कृषी विभागाने तालुकाआधारे प्राथमिक अहवालातून दिला, त्यात ऑगस्टमध्ये सर्व तालुक्यातील मिळून 445 गावांतील 34167 शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला. जिल्ह्यात एकूण ऊस 5967 हेक्टरवरील ऊस पिकांना या अतिवृष्टीचा तडाका बसला. त्या खालोखाल 1778 हेक्टरवरील भात, 663 हेक्टरवरील सोयाबीन, 655 हेक्टरवरील भुईमूग या पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

पंचनामे तयार करण्याची कार्यवाही चालू

"ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामूळे नूकसान झालेल्या सर्व तालुक्यात शेतकऱ्यांच्या नूकसानीचे पंचनामे तयार करण्याची कार्यवाही चालू आहे. येत्या आठ दिवसांत अंतिम आकेडवारी निश्चित होईल."

- नामदेव परिट, कृषी उपसंचालक

तालुक्यानुसार बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि गावे

Advertisement
Tags :
@kolhapur@KOLHAPUR_NEWS#flood#heavy rain#Radhanagari Dam#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacrop damage
Next Article