दिवाळीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, श्रीपादभाऊंकडून जनतेला शुभेच्छा
02:49 PM Oct 20, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपादभाऊ नाईक यांनी गोव्यातील लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Advertisement
Advertisement लाखो लोकांच्या हृदयात दिवाळीला एक विशेष स्थान आहे. दिवाळी सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईट प्रवृत्तींवर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. दिवाळी सणानिमित्त कुटुंबे एकत्र येतात, घरे दिवे आणि आकाकंदीलांनी उजळतात. सांस्कृतिक वारसा आणि दया, एकता आणि सलोख्याच्या मूल्यांची आठवण करून देणारा सण आहे.पुसापती अशोक गजपती राजू,राज्यपाल
दिवाळीचा सण सर्वांना सुख, समृद्धी घेऊन येवो. या दिवशी रावणाचा वध करून अयोध्येत परतलेल्या भगवान रामाचे स्वागत करण्यासाठी लोकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली होती. दिवाळी समाजात शांतता, बंधुता आणि जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देते. गोड आठवणी निर्माण करण्याचा आणि दयाळूपणा पसरवण्याचा हा काळ आहे.डॉ. प्रमोद सावंत,मुख्यमंत्री
दिवाळी आपल्या जीवनात नवा उत्साह, ऊर्जा आणि प्रगतीची नवी दिशा घेऊन येवो. राष्ट्राच्या उन्नतीत प्रत्येक नागरिकाचे योगदान अमूल्य आहे. आपल्या कष्टाने, प्रामाणिकपणाने आणि देशभक्तीच्या भावनेने नवा भारत उजळत राहो. आपण सर्वांनी मिळून राष्ट्रनिर्मितीचा, विकासाचा आणि एकतेचा दिवा पेटवू या. आपल्या प्रयत्नांनी देशाच्या प्रगतीत नव्या तेजाची भर पडो. सर्वांना मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!श्रीपाद येसो नाईक,केंद्रीय राज्यमंत्री
Advertisement
Next Article