नीट परीक्षार्थींना योग्य न्याय द्या
विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : नीट परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. पुन्हा विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा,अशी मागणी एनएसयुआय राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र अन् एनटीएकडून उत्तर मागितले.दरम्यान परीक्षेतील व्यापक अनियमितता व फसवणूक पाहता पुनर्परीक्षेमुळे केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल. ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन अभ्यास केला आहे व चांगल्याप्रकारे परीक्षेला तोंड दिले आहे. अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे पुनर्परीक्षा पारदर्शकपणे घ्यावी व न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.