कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणपतीपुळेतील सरस प्रदर्शनाची विदेशी पर्यटकांना भूरळ

03:47 PM Mar 03, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

५५ बचत गटांचा सहभाग, शहरात बचतगटांना कायमस्वरूपी गाळे

Advertisement

रत्नागिरी

Advertisement

राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभाग अंतर्गत रत्नागिरी महिला आर्थिक विकास महामंडळाला (माविम) ५० वर्ष पूर्ण होत असल्याने महिला दिनाचे औचित्य साधून लोकसंचालित साधन केंद्राच्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची भूरळ विदेशी पर्यटकांना पडली आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव, महिला व बालविकास विभागाचे महिला व बालकल्याण अधिकारी श्रीकांत हावळे तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या पत्नी पूजा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात खेड, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वरमधील ५५ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला असून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला, परराज्यातील तसेच विदेशी पर्यटकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

महिला दिनानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून महिलांना आर्थिक उन्नत करण्याबरोबरच त्यांचा समाजातील स्तर उंचावणारा असल्याचे मत माणिकराव सातव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शासनाने यशस्विनी पोर्टलचीही निर्मिती केली असून महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची नोंदणी करावी. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या तीन टक्के निधीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये बचत गट विक्री केंद्र स्थापित झालेली असून सर्व महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची विक्री या केंद्रांमध्ये करावी, असे आवाहन श्रीकांत हावळे यांनी केले. यावेळी पूजा गोसावी, ‘माविम‘चे जिल्हा समन्वयक अधिकारी अंबरेश मेस्त्री यांनीही मनोगत व्यक्त केले.

या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी उपजीविका विकास सल्लागार विनय चव्हाण, लेखाधिकारी प्रवीण पाटील, एमआयएस सल्लागार रागिणी देसाई, रसिका गोताड यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले आहेत.

इटली, फ्रान्सच्या पर्यटकांनी केली खरेदी
प्रदर्शनाला इटली तसेच फ्रान्स इथून आलेल्या काही पर्यटकांनी भेट दिली. सर्व स्टॉलची पाहणी करून त्यांनी येथून काही वस्तूंची खरेदीही केली.

बचतगटांना शहरात कायमस्वरुपी गाळे
महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीचा तीन टक्के निधी खर्चून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे ‘माविम’ला बचत गट वस्तू विक्री केंद्रासाठी 11 गाळे उपलब्ध करून दिले आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article